Share

भारतात द्वेष पसरवणारी माहिती हाताळण्यात फेसबुक असमर्थ

Published On: 

नवी दिल्ली: फेसबुक भारतातील द्वेष पसरवणारी आणि चुकीची माहिती हाताळण्यात असमर्थ असल्याचे समोर आले आहे. ठरला आहे. भारतात फेसबुकचे सर्वाधिक वापरकर्ते आहेत. मात्र भारतामध्ये चुकीची माहिती, द्वेषयुक्त भाषण आणि हिंसाचारावरील माहिती फेसबुक अपयशी झाल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत असल्याचे अमेरिकन माध्यमाच्या वृत्ताने म्हटले आहे.

सोशल मीडिया संशोधकांनी म्हटले आहे की असे गट आणि फेसबुक पेज आहेत जी द्वेष, भ्रम आणि समुदायविरोधी आक्रोश निर्माण करणाऱ्या गटांनी भरलेली आहेत.

न्यू यॉर्क टाईम्स आणि असोसिएटेड प्रेससह वृत्तसंस्थेने यासंदर्भात आपला अहवाल दिला आहे. फेसबुक कंपनी चुकीची माहिती, द्वेषयुक्त भाषण आणि हिंसाचाराच्या घटनांवर उत्सव साजरा करणाऱ्या घटना यांना हाताळण्यात अपयशी ठरत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. न्यूयॉर्क टाईम्सने फेसबुकच्या अहवालाचा हवाला देत म्हटले आहे की, भारतातील २२ मान्यताप्राप्त भाषांपैकी केवळ पाच भाषांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सामग्रीचे विश्लेषण करण्याची सुविधा आहे, पण हिंदी आणि बंगालीचा आत्तापर्यंत समावेश करण्यात आलेला नाही. ही माहिती फ्रान्सिस होगेन यांनी दिली आहे. जे फेसबुकचे माजी कर्मचारी होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!