कोल्हापूर : देशात सध्या पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्या नागरिक घाईला आला आहे. राजकीय नेते मोदी सरकारवर या मुद्द्यावरुन टीका करताना दिसतात. याच मुद्द्यावरून आता काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. तसंच केंद्र सरकार हे दर कमी करणार नसल्याचंही म्हटलं आहे. कोल्हापुरात आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
केंद्राने पेट्रोलवरील कर कमी केल्यास राज्य सरकारही त्यावरील कर कमी करेल, त्यामुळे पेट्रोलचे दर कमी होऊ शकतात. मात्र सध्या पेट्रोलचे कर हेच केंद्राच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत झाले आहे. त्यावरच सध्या पगारापासून ते विकास कामापर्यंत सर्वकाही खर्च भागवला जात आहे. यामुळे सध्याची भारताची हालाखीची आर्थिक परिस्थिती पाहता पेट्रोलचे कर कमी करतील अशी शक्यता वाटत नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
100 कोटी लोकांना लस दिल्याची सध्या जाहिरातबाजी सुरू आहे. पण देशात फक्त 30 कोटी लोकांना लशीचे दोन्ही डोस दिलेले आहेत. हे प्रमाण देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत केवळ २१ टक्के आहे. जगाच्या तुलनेत लस देण्यात भारत 144 व्या क्रमांकावर आहे, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- नवाब मलिक मुस्लीम आहेत म्हणून त्यांच्यावर टीका केली जाते- संजय राऊत
- गोसावीच्या बॉडीगार्डचे एनसीबीविरोधात खळबळजनक दावे; एसआयटी मार्फत चौकशीची मलिकांची मागणी
- केपी गोसावीच्या सहकाऱ्याच्या आरोपांवर समीर वानखेडेंचे प्रत्युत्तर; म्हणाले…
- कोचिंग क्लासेसनाही लवकरच परवानगी, गृहमंत्री वळसे पाटलांचे आश्वासन
- ‘गांजा फुंकणाऱ्या लोकांबद्दल सहानुभूती असलेले ‘हे’…’; सदाभाऊ खोतांचा परीक्षा गोंधळावर संताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

