🕒 1 min read
नागपूर : महाराष्ट्रातील खासगी शिकवणी वर्ग पुन्हा सुरू करण्याची लवकरच परवानगी देण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे. याबाबत मुख्य सचिवांशी व मुख्यमंत्र्यांशीही वैयक्तिकरित्या बोलू असेही वळसे पाटील यांनी सांगितले.
शाळा व महाविद्यालये सुरू झाली आहेत. तथापि शिकवणी वर्गांना अद्यापही परवानगी नाही. ते बंद केल्याने स्पर्धा परीक्षांच्या तयारीच्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या मोठा धक्का बसला आहे. याबाबत ‘सरकार जगाओ वाणिज्य बचाओ’ संघर्ष समितीचे निमंत्रक व चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेडचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी गृहमंत्री वळसे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.
दरम्यान, काही ठराविक नेत्यांना सक्त वसुली संचालनालय (ईडी), आयकर चौकशीचा ससेमिरा लावून राज्याचे महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डाव असल्याचा आरोप राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शुक्रवारी येथे केला. अंमली पदार्थ तस्करीविरुद्ध राज्याचे पोलीस दल सक्षमपणे कारवाई करीत आहे. मात्र, एनसीबीने कारवाई करताना महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे. जणू काही महाराष्ट्रातच अमली पदार्थ विक्री होते, असा देखावा उभा केला जात असल्याची टीकाही गृहमंत्र्यांनी केली.
ईडी, आयकर हे अलीकडे केंद्र सरकारच्या हातचे बाहुले झाले असून, तशीच कारवाई होत आहे. महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकाऱ्यांना लक्ष करून ईडी, आयकरचे धाडसत्र राबविले जात आहे. परंतु, गत दोन वर्षांत एकाही भाजपच्या नेत्याकडे ईडी, आयकरची नोटीस किंवा धाडसत्र का पडले नाही, असा सवाल गृहमंत्र्यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या
- बिहारींना पोटासाठीच नव्हे शिक्षण आणि हनिमूनसाठीही इतर राज्यांमध्ये का जावं लागतं?, कन्हैय्या कुमारचा सवाल
- IND vs PAK : सामन्यापूर्वीच्या सराव सत्रातून हार्दिक पांड्या गायब; कोहलीच्या चिंतेत वाढ
- ‘कमी प्रमाणात ड्रग्ज सापडल्यास…’, सामाजिक न्याय मंत्रालयाची महत्त्वाची मागणी
- कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासोबतच्या नात्यासंदर्भात अरूसा आलम यांचे स्पष्टीकरण; म्हणाल्या…
- १०० कोटी लसीकरणानंतर पंतप्रधान मोदी आज करणार ‘मन की बात’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
