Share

देशातला आतंकवाद समूळ उखडून टाकण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध- चित्रा वाघ

Published On: 

मुंबई: दाऊद इब्राहीमशी संबंधित मुंबईतील जवळपास २० ठिकाणांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापे टाकले असून भेंडीबाजार नागपाडा, गोरेगाव, मुंब्रा, भिवंडी, सांताक्रुझ येथील एकूण २० ठिकाणांवर छापेमारी करत एनआयएने कारवाई करण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे. यावरूनच भाजप नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांनी केंद्रातील मोदी सरकारचे कौतुक केले आहे.

“मुंबईत एनआयएने मोठी कारवाई करत नागपाडा, भेंडीबाजारसह २० ठिकाणांवर छापेमारी केली आहे. देशातला आतंकवाद समूळ उखडून टाकण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे. देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारे कोणताही दहशतवादी गट या कारवाईतून सुटणार नाही हाच मोदी सरकारचा कडक इशारा आहे.”, असे ट्वीट चित्रा वाघ यांनी केले आहे.

दरम्यान दाऊदच्या संबंधिताकडून चालवण्यात येणाऱ्या दहशवादी जाळ्याची पाळेमुळे खोलण्याचे काम एनआयएकडून सुरु असून यामध्ये संबंधित व्यक्तींच्या मालमत्तांवरही छापे टाकले जात आहेत. त्यामुळे सध्या राजकीय वातावरणही अधिकच तापले असल्याचे दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!