🕒 1 min read
मुंबई: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर आस्मानी संकट कोसळले आहे. महापूर, दरड दुर्घटनेत अनेकांनी जेव गमावला आहे. आता कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे २५ हजार पूरग्रस्त कुटुंबियांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने जीवनावश्यक वस्तुंची मदत रवाना करण्यात आली आहे. यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मदतीचा पुढाकार घेतला आहे.पूरग्रस्तांना एमआयडीसीद्वारे अन्नधान्यांचे वाटप केले जात आहे. यामध्ये राशन, चादरी, बेडशिट, टॉवेल, अन्नपदार्थ यांचा समावेश आहे. याशिवाय पाच ट्रकद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे. ज्या गावांना एमआय़डीसीद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे, तेथील बिघाड दुरुस्त करण्यात आला असून काही ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे, डोंबिवली, पुणे, औरंगाबाद, नाशिक आदी प्रादेशिक कार्यालयांकडून ही मदत देण्यात आली आहे. ठाणे, डोंबिवली एमआयडीसीकडून १००० राशनचे पाकिटे, दोन हजार पाण्याच्या बाटल्या,५५०० चादरी तसेच टॉवेल्स पाठविण्यात आले आहे. तर औरंगाबादमधून ५०० अन्नधान्यांची पाकिटे पाठविण्यात आली आहेत.या भागातील सुमारे २५ हजार कुटुंबियांना एमआयडीसीच्यावतीने मदत दिला जात आहे. पुढील दोन दिवसांत मदतीचे वाटप केले जाणार आहे. शासनदेखील पूरग्रस्तासोबत असल्याचे मंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले आहे.
दरम्यान पूरग्रस्त भागासाठी एमआयडीसीकडून ही मोठी मदत करण्यात आली असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दिपिका कुमारीने अचूक ‘लक्ष्य भेद’त केला उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश
- ‘आम्हाला भीक नको, काम करायचयं’, अभिनेत्री मेघा घाडगेने व्यक्त केली भावना
- ‘गुजरात आणि महाराष्ट्र एकाच देशातील दोन राज्य; मग महाराष्ट्राला मदत एक वर्षानंतर तीही तुटपुंजी का ?
- आता पाहणी नाही मदत सुरु- आदित्य ठाकरे
- कौतुकास्पद! मराठमोळ्या दिपाली सय्यदकडून पूरग्रस्तांसाठी 10 कोटींची मदत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
