Share

मराठा आरक्षणासाठी मंत्र्यांच्या जिल्ह्यात घेणार मेळावे-आ.विनायक मेटे

Published On: 

जालना : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार उदासीन आहे. महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहतोय अशी टीका शिवसंग्रामचे अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांनी केली. त्यामुळे अशोक चव्हाण, राजेश टोपे, अनिल देशमुख, नितीन राऊत, वर्षा गायकवाड, विजय वडेट्टीवार या मंत्र्यांच्या जिल्ह्यात त्यांच्या विरोधामध्ये जनजागृती मेळावे घेण्यात येणार असल्याची घोषणा मेटे यांनी केली.

मराठा आरक्षणावर राज्य तसेच केंद्र सरकारही वेळकाढूपणा करत आहे. यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव हे अख्खे गावच उपोषणाला बसले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसंग्रामचे अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांनी संवाद साधला. मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेत असलेल्या मंत्र्यांच्या जिल्ह्यात मेळावे घेण्यात येणार असल्याची माहिती दिली.

एमपीएससी सतत नवीन अटी मराठा समाजाच्या व खुल्या वर्गाच्या विरोधात पत्रक काढत असून, अटी लादत आहे. सर्वोच्च न्यायालयातही अर्ज करुन हद्द ओलांडली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये शिक्षणावरही बहिष्कार टाकण्यासाठी गावेच्या गावे पुढे येऊ लागली आहेत. यामुळे आरक्षणाचा प्रश्न अजून पेटण्याची आता चिन्हे निर्माण झालीत. त्यामुळे संताप व्यक्त करण्यासाठी मंत्र्यांच्या जिल्ह्यात त्यांच्याविरोधात जनजागृती मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!