Share

मराठा आरक्षण : अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतली साष्टपिंपळगाव ग्रामस्थांची भेट

Published On: 

जालना : मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीपासून साष्टपिंपळगाव मधील गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. आमरण उपोषण मागे घेण्यात आले असले तरीदेखील आंदोलन मागे घेण्यास गावकऱ्यांनी विरोध केला आहे. आज (दि.२५) साष्टपिंपळगाव ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने ठोस भूमिका मांडावी तसेच इतर मागण्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

मराठा समाजातील तरुण आणी तरुणींकडे गुणवत्ता असूनही आरक्षण नसल्यामुळे ते सुशिक्षित बेकारीत आपले जीवन जगत आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या ५० दिवसाहून अधिक कालावधी पासून साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थ उपोषण आणि ठिय्या आंदोलन करत आहे.

याच पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या मध्यस्तीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत आंदोलनकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे पाटील, मुक्ताबाई ढेपे, भारती कटारे, गीता तांबडे, वैष्णवी जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेत आपल्या मागण्या त्यांचा समोर मांडल्या.

साष्टपिंपळगाव येथे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून ठिय्या आंदोलन सुरू असुन या आंदोलनाची दखल शासनाने घेऊन मराठा समाजाला आरक्षण लवकरात लवकर निकाली काढण्याची विनंती सदर बैठकीत करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!