Share

बेकायदेशीर मोबाईल टॉवर प्रकरणी जागरुक नागरिकांनी तक्रार करताच मनपास आली जाग!

Published On: 

औरंगाबाद : शहर परिसरात बेकायदेशीर मोबाईल टॉवर उभारण्याचा सपाटा सुरूच असून, नागरिकांनी तक्रार केल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने शनिवारी (दि. ५) सातारा परिसरात कारवाई केली. महापालिकेला असलेल्या सुट्टीचा फायदा घेत हे टॉवर उभारले जात होते. टॉवरचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. मात्र या जागरुक नागरिकांनी तक्रार केली नसती तर हे प्रकरण मनपासमोर आलेच नसते.

सातारा परिसरातील गट क्रमांक १६१ मध्ये अलोक नगर भागात बेकायदा मोबाईल टॉवर उभारले जात असल्याची तक्रार काही नागरिकांनी महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांना केली होती. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. पथकाने पाहणी केली असता गायकवाड यांच्या घरावर अनधिकृतपणे टॉवर उभारण्याचे काम सुरु होते.

शुक्रवारी (दि.४) रात्री मोबाईल टॉवरसाठी लागणारे साहित्य आणून ठेवले होते. शनिवार व रविवार (दि.६) सुट्टीचे दिवस असल्याने मोबाईल टॉवर उभारणीचे काम सुरू करण्यात आले होते. त्यानुसार सकाळी ११ वाजता पथकाने मजुरांना काम बंद करण्याच्या सूचना केल्या. तेथील साहित्य जप्त करून पंचनामा करण्यात आला.

बेकायदा बांधकामावर कारवाई
भावसिंगपुरा गावात सातपुते हे घराचे अनधिकृत बांधकाम करत होते. तसेच रस्त्यालगत गॅलरी काढली जात असल्याने ती वाहतुकीला अडथळा ठरणारी होती. त्यामुळे बांधकाम बंद करण्यात आले. ही कारवाई पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, वसंत भोये, इमारत निरीक्षक सय्यद जमशिद अतिक्रमण हटाव पथकातील पोलीस यांच्या पथकाने केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!