Share

‘ना नौ मन तेल होगा ना राधा नाचेगी’, फडणवीसांच्या सत्तापालटाच्या विधानाचा मलिकांनी घेतला समाचार

Published On: 

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पंढरपूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी सभेत भाषण करताना पुन्हा एकदा सत्तापालटावर सूचक विधान केलं आहे.

‘केवळ एका मतदारसंघाची निवडणूक आहे, याने काय फरक पडणार आहे ? याने काय सरकार बदलतंय का ? असे सवाल केले जात आहेत. सरकार कधी बदलायच ते माझ्यावर सोडा, ते बदलू आपण. तुम्ही समाधान आवताडेंना विजयी करा, तिकडे मी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करतो’ असं विधान फडणवीसांनी केल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या या विधानाचा राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी समाचार घेतला आहे. ‘गेले पंधरा महिने भाजप महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न करत आहे. मात्र मी त्यांना सांगू इच्छितो, ना नौ मन तेल होगा ना राधा नाचेगी. हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल,’ असं भाष्य नवाब मलिक यांनी केलं असून अशक्य असलेल्या गोष्टींसाठी वापरल्या जाणाऱ्या हिंदी वाकप्रचाराचा (ना नौ मन तेल होगा ना राधा नाचेगी) वापर केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!