औरंगाबाद: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ईडीने आठ तास चौकशीनंतर ३ मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. या मुद्द्यावरून भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. तसेच नवाब मलिक यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा देखील भाजप नेत्यांकडून मागण्यात येत आहे.
भाजप नेते तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. दानवे म्हणाले, राष्ट्रवादीचे नेते म्हणत आहे की, त्यांना माहीत होते मलिक यांना अटक होणार होती. कारण ते भाजप विरोधात बोलतात. पण तसं नसून इकबाल कासकर याने जेलमध्ये मलिक याचं नाव घेतल्याने ते जेलमध्ये जाणार हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना माहीत असल्याने ते तसं म्हणत असावे. त्यामुळे या अटकेमागे कोणतीही राजकारण नसून, गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने ईडी कडून ही अटक झाली असल्याचं दानवे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
“त्याक्षणी माझ्या हृदयाचा ठोका चुकला होता”; ईशान किशनने केला गौप्यस्फोट
नवाब मलिकांनंतर कुणाचा नंबर?; सोमय्या म्हणतात चिट्ठी टाकावी लागेल
कॅसिनोने विना परवानगी फोटो वापरल्याने सचिन तेंडुलकर केस करणार ; ट्विट करत दिली माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

