सांगली : नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देत काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेतली आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती होणार, यावरून राज्याच्या राजकारणात मोठी उत्सुकता आहे.
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक वावही यासाठी भाजप आग्रही होती. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीला महाविकास आघाडी सरकार घाबरत असल्याची टीका देखील भाजपने केली होती. तर, काँग्रेस देखील अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याआधी नव्या विधानसभा अध्यक्षांची नेमणूक व्हावी यासाठी आक्रमक होती. अधिवेशनाचा कालावधी या निवडणुकीसाठी वाढवावा अशी मागणी देखील काँग्रेसने केली होती. मात्र, ही निवडणूक न झाल्याने काँग्रेस नाराज असल्याचं बोललं जात आहे.
आज सांगलीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपच्या टीकांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल. १७१ आमदारांचा महाविकास विकास आघाडीला पाठिंबा आहे, त्यामुळे आम्ही निवडणुकीला घाबरत नाही.’ असं भाजपला खडसावतानाच त्यांनी, ‘विशेष अधिवेशन घेऊन येत्या काही दिवसात अध्यक्ष निवड होईल. कुणाला घाबरण्याचे कारण नाही,’ अशी माहिती देखील दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करायची असेल तर करा – नाना पटोले
- ‘या प्रकरणातील सत्य शोधून काढा आणि…’ ; झोमॅटो मारहाण प्रकरणात परिणीती चोप्राची उडी
- …म्हणून अजित पवारांनी फडणवीसांसोबत एकाच मंचावर येणं टाळलं
- जिल्हा बँक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परभणीतील काही मतदार सहलीवर रवाना
- पाच पैकी फक्त एका राज्यात भाजपची सत्ता येणार, शरद पवारांचे भाकीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
