मुंबई : काही दिवसांपूर्वी शेतकरी संघटनांनी पंतप्रधान पीकविमा योजनेत शेतकऱ्यांच्या अडचणी आणि कृषी विभागाची घुसमट यामुळे राज्यासाठी स्वतंत्र पीकविमा कंपनी असावी अशी मागणी राज्य कृषिमंत्री दादा भुसे(Dada Bhuse) यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने आता कृषी विभागाने प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या पीकविमा योजनेतून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरु झाली असून येणाऱ्याअर्थसंकल्पात अशा स्वरुपाचा प्रस्ताव हा कृषी विभागाकडून पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, या मुद्द्याहून आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.
यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘महाराष्ट्र पंतप्रधान पीकविमा योजनेतून बाहेर पडणार अशी वदंता असून कृषीमंत्री दादा भुसे यांनी स्वतंत्र महाराष्ट्र पीकविमा कंपनीचा प्रस्तावाचे संकेत दिले आहेत. राजकीय द्वेषापोटी भकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वेठिला धरू नये. हे असंविधानिक पाऊल राज्याला विनाशाच्या गर्तेत नेऊ शकते’, असे भातखळकर म्हणाले आहेत.
महाराष्ट्र पंतप्रधान पीकविमा योजनेतून बाहेर पडणार अशी वदंता असून कृषीमंत्री दादा भुसे यांनी स्वतंत्र महाराष्ट्र पीकविमा कंपनीचा प्रस्तावाचे संकेत दिले आहेत.
राजकीय द्वेषापोटी भकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वेठिला धरू नये.
हे असंविधानिक पाऊल राज्याला विनाशाच्या गर्ते नेऊ शकते. pic.twitter.com/bJ3gCaiRa6— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 5, 2022
दरम्यान, पंतप्रधान पीकविमा योजनेमध्ये अनेक त्रुटी असून शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनेचा लाभ होत नाही. त्यामुळे राज्य सरकारने या पीकविमा योजनेमधून बाहेर पडून स्वतंत्र योजना राबवावी अशी मागणी शेतकरी संघटनांनी कृषी विभागाच्या बैठकीत केली होती.
महत्वाच्या बातम्या:
- राहुल गांधींचे टोकदार भाषण सत्ताधाऱ्यांना झोंबणारच- संजय राऊत
- “योगी आदित्यनाथ ‘रिव्हॉल्वर’ आणि ‘रायफल’ धारी संन्याशी”, भातखळकरांनी फोटो पोस्ट करत केले कौतुक
- महाविकास आघाडीचे मंत्री घरात बसून कारभार हाकत आहेत; भातखळकरांची टीका
- “सरकराच्या देशद्रोहावर बोलणे म्हणजेच ‘देशद्रोह’ असा नवा फंडा”
- सुजित पाटकरविरुद्ध पुण्यातील जंबो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या आज तक्रार दाखल करणार


