Share

‘महाविकास आघाडी सरकार बैलासारखं; टोचल्याशिवाय पुढेच जात नाही’

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : राज्यात पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुका अवघ्या एक दिवसावर आल्या आहेत. उद्या म्हणजेच १ डिसेंबर रोजी राज्यातील विविध विभागात मतदान होणार असून महाविकास आघाडी विरुद्ध इतर पक्ष असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीसाठी भाजपचं कडवं आव्हान असून सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

राज्यात कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदी आणि ऐनवेळी काही मागण्यांमुळे शिवसेनेनं भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन स्थापन केलेल्या महाविकास आघाडीच्या नव्या सूत्रानंतर होणाऱ्या या पहिल्याच निवडणुका असल्याने राज्यातील जनता महाविकास आघाडीला कौल देणार की भाजप आपली वर्चस्व राखण्यात यशस्वी होणार याकडं सर्वांचं लक्ष्य लागलं आहे.

या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते कार्यकर्त्यांच्या बैठका व मेळावे घेत आहेत. काल, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ मेळाव्यात बोलताना महाविकास जोरदार निशाणा साधला आहे.

‘महाविकास आघाडी सरकार बैलासारखं आहे. या सरकारला सतत टोचत राहावं लागतं. त्याशिवाय ते पुढेच नाही,’ असा टोला त्यांनी लगावला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विकासकामांना विलंब होत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. ‘नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाची निविदा काढण्यात आली. मात्र सरकार बदललं आणि काम ठप्प झालं. नागपूर ब्रॉड गेज मेट्रोला मंजुरी देण्यासाठी या सरकारला एक वर्ष लागलं. भाजपचं सरकार असतं तर एक महिन्यात झालं असतं’ असं देखील गडकरी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!