नांदेड – जीएसटीच्या बाबतीत सातत्याने आमचा जीएसटी बाकी अशी ओरड महाविकास आघाडी सरकार करीत आहे. काही मंत्री म्हणतात ३८ हजार कोटी शिल्लक आहेत, तर काही जण म्हणतात ६० हजार कोटी शिल्लक आहे. मग केंद्राकडून नेमके किती येणे बाकी आहे. यावर एकमत करा असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी मारला.
महाविकास आघाडी सरकारला एक वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या वर्षभरात अपयशी ठरल्याच्या या सरकाराच्या कामाचा पंचनामा करण्यासाठी व सरकारची पोलखोल करण्याकरिता विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची काल नांदेड येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बोलताना दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारमधील विसंवाद, गोंधळ, निष्काळजीपणा उघड केला.
शेतक-यांच्या बांधावर जाऊन सध्याचे मुख्यमंत्री व त्यावेळेचे शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी २५००० रुपये प्रति हेक्टर हे कोरडवाहू साठी तर ५०,००० रुपये प्रति हेक्टर बागायतीसाठी देण्याचे वचन त्यांनी दिले होते पण सत्तेवर आल्यावर त्या वचनाचा विसर त्यांना पडल्याची टिका करताना दरेकर म्हणाले की, विदर्भ मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली, पूर्णपणे शेती आणि शेतकरी उध्वस्त झालाय , हताश झाला. आज कपाशीचे पीक उध्दवस्त झाले. सोयाबीन सारखी पीकेही अतिवृष्टीमुळे पूर्णपणे उध्वस्त झाली. त्यावेळी सरकारने काही मदत केली नाही. पण भाजपाने याप्रकरणी आंदोलने केली तेव्हा सरकारने १० हजार कोटीचे पॅकेज जाहीर केलं त्यामधून फक्त २ हजार कोटी रुपये दिल्याचे सरकारचे म्हणणे आहे. परंतु शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये एक रुपयाही जमा झालेला नाही असेही दरेकर यांनी निर्दशनास आणून दिले.
कोकणामध्ये निसर्ग चक्रिवादळात कोकणाचे प्रचंड नुकसान झाले, त्यावेळी सरकारने १०० कोटी रायगडला , २५ कोटी सिंधुदुर्गला , २५ कोटी रत्नागिरीला या जिल्ह्यांसाठी जाहीर केले पण आजही ५० टक्के पेक्षा जास्त भागात तेथील शेतकरी व नुकसानग्रस्तांच्या अकाउंट मध्ये पैसे गेले नाहीत. येथील सर्व सरकारच्या मदतीची वाट पाहात आहेत असे सांगतानाच दरेकर यांनी म्हणाले की, कोरोना सारखं संकट हाताळण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले. आज देशभरात अन्य राज्ये कोरोना नियंत्रित आणण्यात यशस्वी झाले परंतु महाविकास आघाडीचे सरकार कोरोनाच्या बाबतीत अजूनही चाचपडत आहे. केवळ केंद्रांकडे बोटं दाखवायची आणि आपले अपयश झाकायचे असा प्रकार महाराष्ट्रात सुरु आहे. कोरोनाच्या काळात प्रत्येक राज्याने आपआपली पॅकेजेस उभी केली आणि राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला पण महाराष्ट्रात या सरकारने काहीच केले नाही असे ते म्हणाले.
.मराठा आरक्षण या विषयावर जाणीवपूर्वक सरकारने दुर्लक्ष केले. मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली. राज्य सरकारने या विषयात निष्कळजीपण दाखविला आहे. सुप्रीम कोर्टात सरकारचा वकील अनुपस्थित असणे, हजर राहिल्यास कागदपत्रे नाहीत अश्या पद्धतीने सरकारचा निष्काळजीपणा दिसून येतो. मराठा आरक्षणाच्या मार्फत ज्या अन्य योजना सुरु होत्या त्या सुरु ठेवण्याची व मराठा समाजाला ताकद देण्याची आमची मागणी होती. परंतु मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न केले नाही. ओबीसी समाजाला झुंजवत ठेऊन समाजा समाजामध्ये वाद वाढवण्याच्या प्रयत्न या सरकारचा सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मराठवाडा वॉटर ग्रीडच्या उपक्रमातून मराठवाड्यात पाण्याची व्यवस्था होणार होती. देवेंद्रजी फडणवीस यांनी हा प्रकल्प मंजूर केला होता. पण आमच्या सरकारने ज्या प्रकल्पाला मान्यता दिली तो प्रकल्प गुंडाळण्याचे काम या सरकारने केले. वैनगंगा हा जो १६३ टीएमसी पाणी उचलून विदर्भ आणि मराठवाडा ला जोडणारा एक उत्तम प्रकल्प होता त्यालाही बासनात गुंडाळण्याचं काम या सरकरने केलं. अशा प्रकारे आम्ही सुरु केलेल्या प्रत्येक विकासकामाला स्थगिती देण्याचं काम या सरकार ने केल्याची टिकाही दरेकर यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- उदयनराजेंचे ‘ते’ वक्तव्य धक्कादायक आणि आक्षेपार्ह आहे : सचिन सावंत
- मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 9 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असणार
- दातृत्वाचा भाव देश व समाजाला पुढे घेऊन जातो – राज्यपाल
- भारताने मालिका गमावली पण या पट्ठ्यानं मनं जिंकली!
- ‘अब होगी किसान कि बात’ : राहुल गांधी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

