🕒 1 min read
मुंबई : मागील काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजपा यांच्यात आरोप-प्रत्यारोपाची मालिका बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सामनामधील आपल्या रोखठोक या सदरामधून शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
भाजपाकडून सातत्याने राज्यातील सरकार पाडण्याविषयी केलेल्या दाव्यांवरून राऊत म्हणाले की,’भाजपाला राज्यातलं सरकार कोणत्याही परिस्थितीत घालवायचंय. पण सरकार घालवण्याची ही कुठली अलोकशाही पद्धत? नागपुरातून काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले ‘आठेक दिवसांत सरकार पाडू असं नागपुरातले भाजपावाले बोलतायत. सरकार पाडू आणि सरकार पडेल या कैचीतच राज्यातला विरोधी पक्ष अडकून पडला आहे’, असेही ते म्हणाले.
दरम्यान, पुढे अनिल देशमुख यांच्या अटकेवरून भाजपाला सुनावत राऊत म्हणाले आहेत की,’हवेतल्या आरोपांवर केंद्रीय तपास यंत्रणा राज्याच्या गृहमंत्र्यांना अटक करते आणि पुढच्या २४ तासांत हेच परमबीर सिंग महाशय चांदिवाल आयोगासमोर सांगतात की अनिल देशमुखांविरोधात माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. आरोप करणारा फक्त पळूनच गेला नाही, तर त्यानं आरोपच नाकारले. देशमुख कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय केंद्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात आहेत आणि भाजपा त्याबद्दल जल्लोष करते. ही मनमानी, मस्तवालपणा आणि विकृत तानाशाही आहे’,असेही त्यांनी लेखात नमूद केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोदी है तो मुमकिन है, हे अशा वेळी खरं वाटतं’, संजय राऊतांचा हल्लाबोल
- आरोप करणारा फक्त पळूनच गेला नाही, तर त्याने आरोपच नाकारले; राऊतांचं ‘रोखठोक’ भाष्य
- केजरीवाल सरकारची मोठी घोषणा ; मोफत रेशन योजनेत अजून सहा महिने वाढ
- कोर्टाने वानखेडेंची ‘ती’ याचिका फेटाळली, देशाला सत्य कळायला हवे- नवाब मलिक
- समीर वानखेडेंनी आर्यन खानचं अपहरण केलं; मलिकांचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
