🕒 1 min read
मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोन दिवसांचा पुणे दौरा केला. यावेळी त्यांनी पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड किल्ल्याला (कोंढाणा) भेट दिली. वयाच्या ७९ व्या वर्षातही राज्यपाल कोश्यारी यांनी गड सर केला. यावेळी त्यांचा उत्साह वाखाणन्याजोगा होता. पायी चालत किल्ला सर करणारे भगतसिंह कोश्यारी हे पहिले राज्यपाल ठरले आहेत. दरम्यान भाजपचे अतुल भातखळकर यांनी ‘कोश्यारींसारखे अभ्यासू राज्यपाल महाराष्ट्राला लाभणे भाग्यच’ असल्याचे म्हटले आहे.
वयाच्या ८० व्या वर्षी राज्यपालांनी सिंहगड पायी सर केला. या प्रसंगी छत्रपती शिवरायांचा शक्ती, युक्ती आणि बुद्धीचा त्रिवेणी संगम असलेले केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर जगाचे नायक होते अशा अचूक शब्दात गौरव केला. असे अभ्यासू राज्यपाल लाभणे हे महाराष्ट्राचे भाग्यच समजले पाहिजे.असे ट्विट करत त्यांनी राज्यपालांवर स्तुतिसुमने उधळली आहे.
वयाच्या ८० व्या वर्षी मा.राज्यपालांनी सिंहगड पायी सर केला. या प्रसंगी छत्रपती शिवरायांचा शक्ती, युक्ती आणि बुद्धीचा त्रिवेणी संगम असलेले केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर जगाचे नायक होते अशा अचूक शब्दात गौरव केला. असे अभ्यासू राज्यपाल लाभणे हे महाराष्ट्राचे भाग्यच समजले पाहिजे. pic.twitter.com/LiLGcFHKDj
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 17, 2021
दरम्यान यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा देत आजच्या पिढीपर्यंत ते कसं रुजवलं जाईल यासंबंधी त्यांनी सांगितले. तसेच तानाजी मालुसरेंच्या बलिदानाचा, त्यागाचा इतिहास सिनेमांतून पोहोचवण्याऐवजी शालेय शिक्षणातून व्हायला कळायला हवा असे वक्तव्य त्यांनी केले.
महत्त्वाच्या बातम्या
- अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर भारताची भूमिका स्पष्ट, घेतला ‘हा’ निर्णय
- ‘मी २०१३ सालीच म्हणालो होतो की भारताने तालिबानसोबत..’; ओवेसींनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला
- ‘राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे’, मनसेची टीका
- ‘भारतात शांतता नांदावी यासाठी लोकसभा अध्यक्ष्यांचे तिरुपतीला साकडे’
- ‘त्या’ धुंद नशेत ते देश, तिरंगा विसरले आहेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
