🕒 1 min read
नवी दिल्ली : अफगाणिस्तानात तालिबानी दहशतवाद्यांनी सरकार उलथवून टाकल्यानंतर इथं अभूतपूर्व गोंधळाची परिस्थिति निर्माण झाली आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीची काल तातडीची बैठक झाली. अफगाणिस्तानमध्ये तातडीनं हिंसाचार थांबवून नव्या, सर्वसमावेशक सरकारची स्थापना करावी, असं आवाहन बैठकीनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आलं आहे.
युएनएससीच्या बैठकीत भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत टीएस तिरुमूर्ती यांनी भारताच्या वतीने सांगितले की, ‘दहशतवादी गटांकडून अफगाणिस्तानचा वापर इतर कोणत्याही देशाला धमकी देण्यासाठी किंवा हल्ला करण्यासाठी केला जात नाही. तोवर शेजारी देश सुरक्षित असतील. आम्ही काबुलच्या हामिद करजई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील चित्र पाहिले आहे. त्यातून लोकांमध्ये दहशत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. महिला, लहान मुले संकटात आहेत. विमानतळासह शहरातून गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानातील सध्याची स्थिती चिंताजनक आहे.’
#WATCH | As a neighbour of #Afghanistan, as a friend of its people, the current situation prevailing in the country is of great concern to us in India. Afghan men, women, & children are living under a constant state of fear: India's Ambassador to UN, TS Tirumurti at UNSC meeting pic.twitter.com/jl2MJeQDXm
— ANI (@ANI) August 16, 2021
तर दुसरीकडे परराष्ट्र मंत्रालयाचे कर्मचारी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात निमलष्करी दलांसह २०० हून अधिक भारतीय सध्या काबूलमध्ये अडकले आहेत. एक भारतीय विमान सध्या काबूल विमानतळावर उभे आहे. मात्र, तालिबान्यांनी शहरात कर्फ्यू लावला असल्याने भारतीय नागरिकांना विमानतळावर कसे आणावे ही मुख्य चिंता आहे.
दरम्यान, भारत सरकार काबुलमधल्या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे आणि तिथून भारतात परतण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची अस्वस्थता आपल्याला कळत आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी ट्वीट संदेशात म्हटलं आहे. तिथे असलेल्या भारतीयांबद्दल अचूक माहिती मिळणं महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
याबाबतची सर्व माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या अफगाणिस्तानच्या विशेष संपर्क क्रमांकावर आणि ईमेलवर द्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. भारत सरकार काबुलमधल्या शीख आणि हिंदू नागरिकांच्या सातत्याने संपर्कात असून त्यांच्या हिताला सरकारचं पहिलं प्राधान्य असेल असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. जयशंकर यांनी काल अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अॅंटनी ब्लिंकन यांच्याशी अफगाणिस्तानमधल्या परिस्थितीबाबत चर्चा केली. जगभरातल्या अनेक बड्या नेत्यांनी अफगाणिस्तानमधल्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकाची होणार आज घोषणा
- अफगाणिस्तानच्या प्रसिध्द निर्मातीने मागितले मदतीचे आवाहन
- लॉर्ड्सवर कोहलीचा मोठा विक्रम, वेस्ट इंडिजच्या महान कर्णधाराला टाकले मागे
- केएल राहुलने संपवला 44 वर्षांचा दुष्काळ, अशी कामगिरी करणारे गावस्कर होते पहिले भारतीय सलामीवीर
- ‘जिम-मॉल सुरु झाले, सिनेमांना इतर पर्याय मिळाले…मात्र नाट्यभूमीचं काय ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
