औरंगाबाद : कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य शासनाने राज्यभरात ब्रेक दि चेनअंतर्गत कडक निर्बंध लावले. यामुळे रेल्वे प्रवाशांची संख्या घटली आहे. परिणामी, नंदीग्राम रेल्वे मंगळवार (दि. १८)पासून रद्द केली आहे. आगामी काळात औरंगाबाद रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या ११ रेल्वेपैकी काही रेल्वे बंद पडण्याची शक्यता रेल्वे विभागाने व्यक्त केली आहे.
औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरून ब्रेक दि चेनच्या कडक निर्बंधाची घोषणा करण्यापुर्वी रेल्वे वाहतूक सेवा सुरळीत होती. यात साई दर्शनासाठी येणार्या रेल्वेपासून ते तिरूपती दर्शनासाठी नियोजित रेल्वे सुरू करण्यात आलेल्या होत्या. मात्र कोरोना रूग्ण वाढत असल्याने राज्य शासनाने कडक निर्बंध लागू करत नंतर लॉकडाऊनही लावले. यामुळे चेन्नई नगरसोल, साई नगर शिर्डी, काकीनाडा, विजयवाडा आणि अन्य काही रेल्वे सेवा रद्द करण्यात आलेली आहे.
तसेच मुंबईला जाणार्या प्रवाशांची संख्या कमी असल्या कारणाने जालना-औरंगाबाद-सिएसटीएम जनशताब्दी एक्सप्रेसही रद्द केलेली आहे. सध्या औरंगाबाद रेल्वे मार्गावर नियमित ११ रेल्वे धावत आहेत. यात मुंबईसाठी राज्यराणी एक्सप्रेस, तपोवन एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस या तीन रेल्वे धावत आहेत. तर हैदराबादसाठी अजिंठा एक्सप्रेस, औरंगाबाद हैदराबाद एक्सप्रेस, हैदराबाद जयपूर एक्सप्रेस या रेल्वे सुरू आहेत.
दिल्लीसाठी सचखंड ही नियमित रेल्वे सुरू असून आठवड्यातून एकदा जाणारी मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेस ही रेल्वे सुरू आहे. या व्यतिरिक्त पुणे आणि धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस सध्या सुरू आहे. या रेल्वेलाही प्रवाशांचा कमी प्रतिसाद प्रतिसाद मिळत आहेत. त्यामुळे या रेल्वेही आगामी काळात रद्द होण्याची शक्यता आहे. पूर्वीची मुंबई नागपूर नंदिग्राम एक्सप्रेस सध्या नांदेडपर्यंतच धावत आहे. या रेल्वेला प्रवाशी मिळत नसल्याने ही रेलवे रद्द करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. मंगळवारपासून ते पुढील आदेशापर्यंत ही रेल्वे बंद केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अबब! करुणा मुंडेंकडून धनंजय यांची संपत्ती जगजाहीर, मुख्यमंत्री ठाकरेंना म्हणाल्या..
- ‘लोकं मला सांगतात की, एखाद्या मंत्र्याची बायको लोकांच्या थेट संपर्कात राहते हे आम्ही पहिल्यांदा पाहतोय’
- अभिनेत्री पल्लवी जोशी आणि पती विवेक कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांची करणार मदत
- मोबाइल मेडिकल व्हॅन ग्रामीण भागासाठी आरोग्यदूत ठरेल- जिल्हाधिकारी
- नितीन गडकरी यांचा सल्ला त्यांचे बॉस ऐकतायत का? ; काँग्रेसचा सवाल


