Share

कांद्यावरील निर्यात बंदी लवकरात लवकर हटवा- निलेश लंके

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- देशातील कांद्याचे वाढते दर पाहता केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. केंद्राच्या या अनपेक्षित निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. कांदा निर्यातीवर केंद्राने बंदी घातल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. हा निर्णय शेतकऱ्यांवर अन्यायकारक असून तो शेतकरी हिताचा नसल्याने, कांदा निर्यात बंदी लवकरात लवकर हटविण्याची मागणी पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आ.लंके यांनी निवेदनात म्हटले आहे की, मार्चपासून शेतकरी कोरोनाच्या संकटात सापडलेला असल्याने केंद्र सरकारने पुन्हा शेतकऱ्यांना संकटात टाकू नये. कांद्यावरील निर्यात बंदी लवकरात लवकर मागे घ्यावी. तसेच कोरोना संकटाच्या काळात निर्यात बंदी म्हणजे कोरोना पेक्षाही मोठे संकट असल्याचे सांगत वेळप्रसंगी कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सरकारने हा निर्णय रद्द करण्याची मागणीही निवेदनात लंके यांनी केली आहे.

केंद्राच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होतील. कांद्याचे भाव कोसळतात त्यावेळी केंद्र सरकार कधी अनुदान देते का? केंद्र सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड नाराज झाला आहे. केंद्राने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी आ.लंके यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!