अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाची राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थिती अतिमागास झालेली असल्याने मुस्लिम समाजास तातडीने आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत पाथर्डी तालुका सकल मुस्लिम समाजाच्या वतीने नायब तहसीलदार पंकज नेवसे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील मुस्लिम समाज सर्व स्तरांवर अतिशय मागास झाला आहे. सच्चर समिती, मोहम्मदूर रहमान समिती आणि रंगनाथ मिश्रा आयोग यांनी सखोल अभ्यास करून आपापल्या अहवालात मुस्लिम समाजाला दहा टक्के आरक्षण मिळावे अशी शिफारस केली आहे. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची कायदेशीर बाजू संविधानानुसार भक्कम आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर कायदा करून मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे.
तसेच आघाडी सरकारने मुस्लिम आरक्षण देण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे आगामी अधिवेशनात मुस्लिम आरक्षण कायदेशीर व घटनात्मक रित्या द्यावे, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष नासिर शेख, लाला शेख, रफिक शेख, परवाज पठाण, अक्रम आत्तार, जुनेद पठाण, हारूण मणियार, अमजद आत्तार, आरिफ जहागीरदार, इरफान खान, असलम सय्यद, सिकंदर शेख, अमीर पठाण आदींसह मुस्लिम बांधव उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांचं मरण हेच मोदी सरकारचं धोरण, सुलतानी निर्णयाविरोधात शेतकरी उतरला रस्त्यावर
- शेतकरी हिताचा निर्णय घ्या, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात
- ‘कांद्याला थोडा भाव मिळत आहे म्हणून केंद्र सरकारच्या पोटात पोटशूळ उठला’
- …अन्यथा शेतकरी शांत बसणार नाही, सदाभाऊ खोतांचा केंद्राला इशारा
- ‘कांदा निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रकार’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

