🕒 1 min read
औरंगाबाद : राज्यसरकारने आपल्या वाट्याचा निधी लाभार्थ्यांना वितरीत केलेले असुन केंद्र सरकारचा एकही रुपयाचा निधी प्राप्त न झाल्याने योजना रखडली असुन लाभार्थी हैरान आहेत अनेकांचे संसार उघड्यावर आल्याची कैफियत पंप्रधानांना दिलेल्या पत्रामध्ये एका लाभार्थ्याने व्यक्त केली आहे.
सन २०१७ साली पैठणमध्ये प्रधानमंत्री आवास योजना सुरु करण्यात आलेली असुन या अंतर्गत ७१० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली, प्रारंभी लाभार्थ्यांना तीन टप्यात राज्य शासनाकडून आलेल्या निधीचे वितरण करण्यात आले. त्या अंतर्गत लाभार्थ्यांना प्रती लाभार्थी जवळपास १ लाख ४० हजाराचा निधी तीन टप्यात खात्यात वर्ग करण्यात आलेला आहे.
राज्य शासनाकडील तीन टप्यातील निधी जवळपास संपत आलेला आहे, तर आता लाभार्थ्यांना केंद्राच्या निधीची प्रतिक्षा आहे, आणि केंद्राचा निधी प्राप्त न झाल्याने अनेक लाभार्थ्यांची घरे आज देखील अर्धवट आहे, अनेक लाभार्थी घर पाडून बसल्याने भाड्याच्या घरात राहत असुस योजना सुरु झाल्यापासुन हे लाभार्थी भाडे भरत आहे, हि सर्व कैफीयत या पत्रा व्यक्त करण्यात आली आहे, तसेच लवकरात केंद्र सरकारने लाभार्थ्यांना या योजनेतील उवर्वरी निधी देण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राहुलच्या शतकी खेळीने वाढल्या ‘या’ खेळाडूंच्या अडचणी, पुनरागमनाची वाट झाली खडतर
- ‘आजपासून २५ वर्षांनी जे कोणी पंतप्रधान असतील…’
- ‘मला अजितदादाही १२ आमदारांबद्दल बोलत नाहीत, तुम्ही कोण विचारणारे?’ राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला सुनावले
- ‘जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका’, स्वातंत्र्यदिनी मोदींची मोठी घोषणा
- कोरोना संकटातील भारताची लढाई हा जगभरात चर्चेचा विषय-पंतप्रधान मोदी

