Share

“देशातील दोनचार श्रीमंत आणखी किती श्रीमंत होत जातात पाहूच”, संजय राऊतांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज देशाचा अर्थसंकल्प (Budget) संसदेत सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प आहे. मात्र यावरच यंदाच्या बजेटमध्ये सर्वसामान्यांसाठी काहीच नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut)यांनी दिली आहे.

“मोदी सरकारचे बजेट नेहमीच आभासी आणि फसवे असते. (Modi government budget is always virtual and fraudulent)त्यांच्या बजेटमध्ये सर्वसामान्यांसाठी काहीच नसते. आणि यंदाही असेच झाले आहे. यंदाच्या बजेटमध्ये सर्वसामान्यांसाठी काहीच नाही. गरिबांचा गळा किती आवळतात आणि देशातील दोनचार श्रीमंत आणखी किती श्रीमंत होत जातात ते, येत्या काळात पाहूच”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

दरम्यान आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी टीकेची झोड उठवली असतानाच दुसरीकडे भाजप नेत्यांनी भारताला आत्मनिर्भरतेकडे आणि अधिक बलशाली करणारा अर्थसंकल्प असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते अतुल भातखळकर अशा नेत्यांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!