मुंबई: आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला आहे. यात त्यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. तब्बल ६० लाख नव्या नोकऱ्या, ४०० नव्या वंदे भारत ट्रेन अशा धडाकेबाज घोषणांनी बजेटची ओपनिंग केली. मात्र, यासाठी निधी कसा आणि कुठून आणणार याचा उल्लेख त्यांनी भाषणात तरी केला नाही.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या बजेटनंतर विरोधकांनी चंगलीच टीका करायला सुरुवात केली आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी टीका करत म्हणलं की, पगारदार आणि मध्यमवर्गाच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प. कोविड काळात संकटात सापडलेल्या मध्यमवर्गासाठी आयकरात कुठलाच बदल किंवा सवलत नाही. हे सरकार संवेदनशील नाही. सामान्य माणसांचा आवाज ऐकायचा नाहीच असंच सरकारने ठरवलेले दिसते, अशी टीका केली त्यांनी केली होती.
आता शिवसेना नेते तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी देखील या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, हे अर्थसंकल्प वाटत नसून जाहीरनामा वाटत आहे, यात घोषणा जास्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे निवडणुकीचं बजेट वाटत आहे. या बजेटमध्ये जास्त तरतूद दिसत नाहीत. जीएसटी जो वाढवला आहे त्याचा राज्यांना काय फायदा होणार, जीएसटी परतावा मिळत नसल्याने आर्थिक अडचण होत आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
नितेश राणेंना मोठा धक्का; सिंधुदुर्ग न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
“माझं कुठलं पात्र तुम्हाला आवडतं?”, दीपिका पादुकोणच्या प्रश्नावर पती रणवीर उत्तरला…
सोयगाव नगरपंचायतीमधील ४ सदस्यांचा भाजपला रामराम; शिवसेनेत प्रवेश, सत्तारांचा रावसाहेब दानवेंना झटका!
आगामी वेस्टइंडीज विरुद्ध इंडिया टी-२० मालिकेसाठी ममता बनर्जी सरकारचा मोठा निर्णय
“राजाला जर कल्याण साधायचं असेल…”, अर्थसंकल्पादरम्यान निर्मला सीतारामण यांनी दिला महाभारताचा संदर्भ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

