Share

कुलदीपच्या कारकिर्दीतील अंधार संपेना; अक्षरच्या पुरागमनाने कसोटी संघातून हकालपट्टी

Published On: 

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या कारकिर्दीतील अंधार संपता संपत नाहीये . भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेसाठी प्रदीर्घ काळानंतर कुलदीप यादवचे नाव कसोटी संघात आले. मात्र आता मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यानंतरच कुलदीपला कोणतीही चूक नसताना संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अक्षर पटेलचे संघात पुनरागमन झाल्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापनाने कुलदीप यादवला संघातून वगळले आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेत अक्षर पटेलचा (akshar patel) बॅकअप म्हणून कुलदीप यादवची (kuldeep yadav) निवड झाली नसली तरी संघ व्यवस्थापनाचे असे मत आहे की तीन डावखुऱ्या फिरकीपटूंची संघाला गरज नाही, रवींद्र जडेजा (ravindra jadeja) देखील या मालिकेचा एक भाग आहे. याशिवाय १८ सदस्यीय संघात आर अश्विन (Ravichandran Ashwin) आणि जयंत यादव हे आणखी दोन फिरकीपटू आहेत. अशा परिस्थितीत आता अक्षर पटेलच्या पुनरागमनानंतर कुलदीप यादवचा पत्ता भारतीय कसोटी संघातून काही काळासाठी कापला गेला आहे.

कुलदीप यादवची टीम इंडियात येण्याची आणि बाहेर होण्याची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. २०१७ ते २०१९ या कालावधीत टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट घेणार्‍या कुलदीप यादवचे अशी परिस्थिती भारतीय क्रिकेट रसिकांना पाहवत नाहीये. कुलदीप यादवने १३ फेब्रुवारी २०२१ रोजी इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. या मालिकेत त्याला पुनरागमनाची संधी मिळेल असे वाटत असताना त्याला एकही सामना न खेळवता संघ व्यवस्थापनाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!