🕒 1 min read
मुंबई: T20 फॉरमॅटमध्ये मैदानावर आणि मैदानाबाहेर नेहमीच मनोरंजनात्मक गोष्टी घडत असतात. स्पर्धेत मारले जाणारे मोठे सिक्सर, मैदानावरील प्रेक्षकांचा सहभाग यामुळे टी-२० क्रिकेट एक संपूर्ण मनोरंजनाचे पॅकेज बनले आहे. विशेषत: जेव्हा भारतीय क्रिकेट संघ मायदेशात खेळतो. तेव्हा उत्साह आणखी एका पातळीवर जातो. धर्मशाला येथे श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या T20I दरम्यान अशीच एक गमतीशीर घटना घडली जेव्हा कुलदीप आणि सिराज जे डगआऊटवरून टीम हडलकडे जात होते, ते अंपायरच्या मार्गात आले आणि मागे उभे राहून अंपायरने निर्णय देण्यापूर्वी त्यांनी नक्कल करत आऊट असे चिन्ह दिले.
झाले असे कि १० व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूदरम्यान, चरिथ असलंकाला (Charith Asalanka) एलबीडब्ल्यू देण्यात आला कारण चेंडू स्टंपच्या अगदी समोर पॅडवर आदळला होता. फलंदाज रिव्ह्यूसाठी जात असताना अंपायरने त्याला बाद ठरवले. याच काळात सिराज (mohmmad siraj) आणि कुलदीप (kuldeep yadav) यांनी अंपायर मदनगोपाल यांची नक्कल केली. त्यांनी निर्णयाच्या आधीच हात दाखवत आनंद साजरा केला. त्यांचा तो व्हिडीओ मोठ्या संख्येने व्हायरल होत आहे.
These Guys ???????? @mdsirajofficial & @imkuldeep18 #INDvWI #RohitSharma #CricketTwitter pic.twitter.com/tBVIZYWgVf
— Ravi Prakash???????? (@impravi06) February 26, 2022
भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध मालिका जिंकली आहे. श्रीलंकेला टी २० सामन्यात एकही सामना जिंकता आला नाही ज्यामुळे भारताने क्लीन स्वीप केले आहे. भारतीय संघाने शेवटच्या सामन्यात श्रीलंकेला ६ गडी राखत पराभूत केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही- सुप्रिया सुळे
- जनतेचे मनोबल वाढवणारा योद्धा म्हणून झेलेन्स्की यांचे नाव इतिहासात कोरले जाईल- संजय राऊत
- श्रीलंकेच्या मालिका विजयानंतर कर्णधार रोहितचा सहकारी खेळाडूंना विशेष संदेश म्हणाला…
- राज्यपालांच्या वक्तव्यावर अतुल लोंढेंचे टीकास्त्र; म्हणाले,“हे लोकं सातत्याने महाराजांचा…”
- “… त्या भाजप नेत्यांनी युक्रेनप्रश्नी कुंपणावर बसून फापडा खाणेच पसंत केले”, संजय राऊतांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
