मुंबई : भारतीय संघाचा स्टार फलंदाज केएल राहुल दुखापतीनंतर संघात पुनरागमन करण्यासाठी तयार आहे. त्याची वेस्ट इंडिजविरुद्धच्या ५ टी-२० मालिकेच्या संघात निवड झाली आहे. पण, तो फिटनेस चाचणी पास झाल्यावरच सामने खेळू शकेल. ही परीक्षा पास होण्यासाठी तो खूप मेहनत घेत आहे. केएल राहुलचे सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन सुरू आहे. राहुलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर यासंबंधीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तो मैदानावर कसून सराव करताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये केएल राहुल वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करताना दिसत आहे. त्याच्या तयारीकडे पाहून असे वाटते की तो आता संघात खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे. जर राहुल फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाला तर तो २९ जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होणाऱ्या ५ टी-२० मालिकेत खेळताना दिसू शकतो. त्याच्याशिवाय कुलदीप यादवही फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर वेस्ट इंडिजला जाणार आहे.
राहुल आयपीएल २०२२ पासून संघाबाहेर
के एल राहुल आयपीएल २०२२ पासून संघाबाहेर आहे. जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ५ टी-२० सामन्याच्या मालिकेत रोहित शर्माच्या अनुपस्थितीत तो भारतीय संघाचे नेतृत्व करणार होता. पण कंबरेच्या दुखापतीमुळे तो संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला. यानंतर इंग्लंड दौऱ्यावरही राहुलला जागा दिली नाही. त्याच्यावर नुकतीच जर्मनीमध्ये शस्त्रक्रिया झाली आणि त्यानंतर तो त्याचे पुनर्वसन पूर्ण करत आहे. राहुलचा याअगोदर एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी नेटमध्ये त्याला गोलंदाजी करताना दिसली. जर केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त मैदानावर परतला तर त्याला ऑगस्टमध्ये होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार बनवले जाऊ शकते.
https://www.instagram.com/reel/CgOzdRFA0rH/?igshid=YmMyMTA2M2Y=
भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा २२ जुलैपासून सुरू होणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात कॅरेबियन संघासोबत ३ वनडे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत टीम इंडियाच्या अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
भारत vs वेस्टइंडीज वनडे वेळापत्रक
२२ जुलै – पोर्ट ऑफ स्पेन
२४ जुलै- पोर्ट-ऑफ-स्पेन
२७ जुलै – पोर्ट-ऑफ स्पेन
महत्वाच्या बातम्या :
- vinayak raut : “लोकसभाध्यक्षांनी आमच्या पत्राची दखल न घेता…”, विनायक राऊतांचा गंभीर आरोप
- Maharashtra Politics | “अशा सत्तेला चिमट्यानेही स्पर्श…” ; महाराष्ट्रातील राजकीय संकटात अटलबिहारी वाजपेयींचे भाषण व्हायरल
- Eknath Shinde : आम्ही बांठिया आयोगाशी चर्चा करून अडचणी दूर केल्या – एकनाथ शिंदे
- Sandhya Sawalakhe : लोकांची घरे बरबाद करण्याचे कार्यक्रम बंद करा; संध्या सव्वालाखेंनी चित्रा वाघांना फटकारलं
- presidential election result। राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीची मतमोजणी सुरु; द्रौपदी मुर्मू यांच्या घरी आणि गावी जल्लोषाची तयारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

