Share

‘नोटीसा काढणारेच नंतर तुरुंगात जातात’; किरीट सोमय्यांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) महाविकास आघाडी सरकारच्या हात धुवून मागे लागले असल्याचे दिसत आहे. पुण्यातील जंबो कोविड सेंटरमध्ये (Pune Jambo Covid Centre) घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) तसेच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर केला आहे.

किरीट सोमय्या पुण्यात आले असताना त्यांना शिवसैनिकांनी (Shivsainik) धक्काबुक्की केली होती. त्यानंतर पुन्हा ते पुणे महापालिकेत आले त्यावेळी भाजप नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला होता. त्यानंतर किरीट सोमय्या पुन्हा एकदा आक्रमक झाले असल्याचे बघायला मिळत आहे. धक्काबुक्की प्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे, यावर बोलताना सोमय्या म्हणाले, जर तुम्ही म्हणता तसं काही घडलच नाही तर मग निलंबित का केलं, एवढं का घाबरलात?, असा टोला ठाकरे सरकारला लगावला आहे.

पुढे बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, हातपाय तोडले तरी किरीट सोमय्या लढत राहणार. राज्याला घोटाळेमुक्त करणार, असा इशाराही सोमय्या यांनी दिला. आतापर्यंत मला १४ नोटीसा आल्या. नोटीसा येणं आता नवं राहिलं नाही. सगळेच नोटीसा काढतात. नंतर हेच नोटीसा काढणारे तुरुंगात जातात, असा टोमणाही त्यांनी लगावाला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!