Share

‘ठाकरे सरकारचा जमीन घोटाळा’; किरीट सोमय्या यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

Published On: 

मुंबई: भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे आरोपांवर आरोप सुरूच आहेत. एक झालं की दुसरं प्रकरण शोधून काढून महाविकास आघाडी सरकारवर आरोपांच्या फायरी सुरूच आहेत. अशातच आता किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या आरोप करताना म्हणाले, ठाकरे सरकारने २८ नोव्हेंबर २०१९ रोजी शपथ घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी २९ नोव्हेंबर रोजी दहिसर येथे २.५ एकर जमीन ९०० कोटीत अल्पेश अजमेरा बिल्डरकडून विकत घेतली, असल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान प्रत्यक्षात ही जमीन पूर्णपणे अतिक्रमणची असल्याने ती खरेदी न करण्याचा निर्णय बीएमसीने (BMC) घेतला होता.

महापालिका आयुक्त अजोय मेहता, प्रवीण परदेशी ह्यांनी ही विरोध नोंदविला होता. मात्र तरी देखील ठाकरे सरकारने दहिसरची ही जमीन विकत घेतली. मुंबई महापालिकेने ३४९ कोटी रुपये दिले आहेत. उरलेले पैसे द्यायचे आहे. ह्याला म्हणतात ‘ठाकरे सरकारचा जमीन घोटाळा’ असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत हा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!