🕒 1 min read
औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यातील चिंचोली बु. येथे कृषी विभागातर्फे शेतक-यांना खरीप हंगामपुर्व प्रशिक्षण देण्यात आले. यात सोयाबीन बियाणे उगवन क्षमता चाचणी, रासायनिक खतांचा संतुलित वापर तसेच माती परिक्षण आधारित खत व्यवस्थापण, जमीन सुपीकता निर्देशांकानुसार द्यावयाची खत मात्रा, युरीया रासायनीक खताचा १० टक्के कमी करणे याबाबत मंगळवारी दि.२५ प्रात्याक्षीक दाखवून कृषि अधिका-यांनी मार्गदर्शन केले.
तालुका कृषि अधिकारी काकासाहेब इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यात चिंचोली येथे मंगळवारी हा प्रशिक्षण मेळावा घेण्यात आला. कृषी सहायक रामभाऊ साळुंके यांनी रासायनिक खतांचा वापर कमी कसा करता येईल.
तसेच माती परीक्षण आधारे रासायनिक खताबरोबत शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, हिरवळींचे खते यांचा वापर करणे व बियाण्यास पेरणीपुर्वी अझिटोबॅक्टर, रायझोबियम पीएसबी यांची बीजप्रक्रीया केल्यास जमीनीतील नत्र स्फुरद पालाश या अन्नद्रव्यांची कमतरता भरुन काढता येते, युरीया खत करताना निम कोटेड, झिंक कोटेड युरीया वापरल्यास त्याचा अधिक फायदा होतो, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी काकासाहेब इंगळे, कृषी सहायक रामभाऊ साळुंखे यांनी दिली. यावेळी कृषि पर्यवेक्षक नामदेव जिंदे, सरपंच मिना विलास मते, कृषि मित्र लक्ष्मण मते, चंद्रनाथ मते यांची उपस्थीत होते.
महत्त्वाच्या बातम्या
- मागासवर्गीय पदोन्नतीचा आदेश रद्द करण्यात यावा, वंचित बहुजन आघाडीची मागणी
- डॉक्टरांविषयी ‘ते’ वक्तव्य अंगलट; IMA कडून बाबा रामदेव यांना १ हजार कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस
- ‘तुम्ही तज्ज्ञ नाहीत, रुग्णांच्या जिवाशी खेळू नका’, व्हेंटिलेटर प्रकरणावरून खंडपीठाने नेत्यांना सुनावले
- ‘राज्यकर्त्यांनी राजकारण सोडून मराठा समाजासाठी एकत्र यावे’, खा.संभाजीराजेंचे आवाहन
- मराठा समाजाला न्याय मिळावा हीच आपली भूमिका-खा.संभाजीराजे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
