मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी आज(२ जाने.)पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत एनसीबीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच माझ्या जावयाच्या घरातून कुठलीही आक्षेपार्ह वस्तू जप्त केली गेलेली नाही. पंचनाम्यातही तसं नमूद करण्यात आलंय, असेही मलिक यावेळी म्हणाले.
याच पार्श्वभूमीवर भाजप नेते केशव उपाध्ये(Keshav Upadhye) यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. यासंदर्भात केशव उपाध्ये यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’फक्त माझ्याच जावयाविरूध्द कारवाई का केली हा खरा नवाब मलिक यांच्या प्रश्न आहे. त्यासाठी हा सारा प्रयास, होतो आहे पत्रकारपरिषदांचा अट्टाहास. ज्या महाराष्ट्रात कन्येच्या गुणवाढीमध्ये मुख्यमंत्र्यांना जावे लागले त्याच महाराष्ट्रात एक मंत्री जावयासाठी प्रेस घेत आहे’, असे उपाध्ये म्हणाले आहेत.
फक्त माझ्याच जावयाविरूध्द कारवाई का केली हा खरा @nawabmalikncp यांचा प्रश्न#जावईबचावमोहीम
त्यासाठी हा सारा प्रयास,
होतो आहे पत्रकारपरिषदांचा अट्टाहास
ज्या महाराष्ट्रातकन्येच्या गुणवाढीमध्ये मुख्यमंत्र्यांना जावे लागले त्याच महाराष्ट्रात एक मंत्री जावयासाठी प्रेस घेतआहे pic.twitter.com/aPVQgXejL0— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 2, 2022
दरम्यान, पत्रकार परिषदेदरम्यान मलिक यांनी एक ऑडिओ क्लिप जाहीर केली असून हि क्लिप नसीबी अधिकारी आणि पंच यांची असल्याचा दावा केला आहे. तसेच यावेळी बोलत असतांना मलिक म्हणाले की,’जवळपास दोन महिन्यांपूर्वी झालेल्या क्रुझ रेड प्रकरणात एनसीबीचा फर्जीवाडा सुरू असून मॅडी नावाचा एनसीबीचा एक पंच आहे त्याला बाबू नावाचा एक अधिकारी पंचनामा बॅक डेटेडवर सही करण्यासाठी सांगत आहे. त्यानंतर घाबरलेला पंच समीर वानखेडेंना फोन करुन विचारतो तेव्हा समीर वानखेडे सांगतात की, सही करा काही होणार नाही. एनसीबीचे अधिकारी अडचणीत येणार हे लक्षात येताच पंचनामे बदलण्याचे काम सुरू आहे.’
महत्वाच्या बातम्या
- …त्यामुळे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये- संजय राऊत
- ‘मावळत्या वर्षातील जळमटे दूर करून खोटे बोलणाऱ्यांना घरी बसवा’
- ‘यामधून सामान्य हिंदुस्थानी माणसाचे भवितव्य कसे सुधारणार?’, संजय राऊतांचा सवाल
- ‘ज्यांना गांधीजींवर हल्ले करणाऱ्यांचा विचार मान्य आहे,त्यांनी जगात जाऊन गांधी विचारांचा वारसा सांगू नये’
- ‘रोज एक पत्रावळी छापून गरळ ओकण्यापेक्षा…’, राम सातपुतेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल


