Share

‘दिलेला शब्द पाळा, केंद्रावर जबाबदारी ढकलू नका’ पंकजांनी ठाकरे सरकारला सुनावले

Published On: 

बीड : केंद्र सरकारने १ मेपासून १८ वर्षापुढील नागरिकांना कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. पण महाराष्ट्रात सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण लगेच मोठ्या प्रमाणावर लस मिळणार नसल्याने राज्यात १ मे रोजी लसीकरण करण्यात येणार नाही. मे अखेरीपर्यंत व्हॅक्सीन मिळाली तर लसीकरण करता येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य सरकारची भुमिका स्पष्ट केली.

यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी लसीकरण मोहीम यशस्वीतेसाठी ठाकरे सरकारला सल्ला दिला आहे. जास्तीत जास्त लसीकरण केंद्र आणि कमीत कमी अवधी या सूत्रानेच लसीकरण मोहीम यशस्वी होईल, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच १८ वर्षांवरील व्यक्तीचे लसीकरण करण्याचा दिलेला शब्द पाळा, केंद्रावर जबाबदारी ढकलून चालणार नाही, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारला सुनावले.

१ मे रोजी सेकंड डोस उपलब्ध करणे शासनाला क्रमप्राप्त आहे. तो शब्द शासनाने जनतेला दिला आहे तो पाळलाच पाहिजे. केवळ केंद्र सरकारवर जबाबदारी टाकून जमणार नाही. राज्याचे व्हॅक्सीन, रेमडेसिवीरचे ऑडिट आणि दैनंदिन वार्तापत्रं झाले पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे. लसींचं उत्पादन करणे, साठा बनवणे, तापमान नियंत्रित करणे यावर प्राधान्याने लक्ष केंद्रीत करावे लागेल, असं पंकजा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. लसीकरण होताना विलंब दिरंगाई होता कामा नये.. रेमडेसिवीर सारखे वाटप अन्यायकारक होऊ नये. हे अत्यंत महत्वाचे आहे, असा सल्लाही त्यांनी दिलाय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!