मुंबई : धर्मा प्रोडक्शन या निर्मिती संस्थेअतर्गत साकारल्या जाणाऱ्या ‘दोस्ताना 2 या चित्रपटातून कार्तिक आर्यनची एक्झिट झाल्याची अधिकृत माहिती समोर आली. यामागे दिग्दर्शक करण जोहरसोबत झालेला वाद हे कारण सांगण्यात येत आहे. धर्मा प्रॉडक्शनमध्ये कार्तिकला न घेण्याचेही करणने ठरवले आहे.
कार्तिक आर्यनच्या बेजबाबदार वर्तवणुकीमुळे करणला नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागला आहे. धर्मा प्रोडक्शन, करण जोहर आणि कलाविश्वात होणाऱ्या घराणेशाहीवर देखील आता प्रश्न उपस्थित होत आहेत.
IT'S OFFICIAL… #KaranJohar chooses to maintain a dignified silence regarding the controversy surrounding #Dostana2… OFFICIAL STATEMENT… pic.twitter.com/xoeSGJeHA7
— taran adarsh (@taran_adarsh) April 16, 2021
माध्यमांच्या माहितीनुसार करणने हे करण्यामागील कारण म्हणजे कार्तिक आर्यनचे अनप्रोफेशनल वागणं. असं म्हणतात की, कार्तिकने चित्रपटाच्या अनेक सीन्स शूटिंगनंतर सुमारे 20 दिवस शूटिंग पूर्ण केलं होतं. पण त्यानंतर अचानक कार्तिकला चित्रपटाचा दुसरा भाग आवडला नाही.
त्याने सिनेमात बदल करण्याची मागणी केली पण करणने हे अजिबात मान्य नव्हते. करणने कार्तिकला चित्रपटातून काढून टाकलं.आता करणने कार्तिकला सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे, पण कार्तिकने अद्याप तसे केले नाही.
महत्वाच्या बातम्या
- विनामास्क फिरणे पडले महागात; ५ हजार जणांकडून ६ लाखांचा दंड वसूल
- हलगर्जीपणा करणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला – हसन मुश्रीफ
- ‘मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना ३ वेळा फोन केला पण ते सध्या बंगालाच्या प्रचारात व्यस्त आहेत’
- कुंभमेळ्यातून येणाऱ्या लोकांना थेट विलगीकरणात पाठवण्यात येणार – पेडणेकर
- नांदेड जिल्ह्यातील १३ तालुक्यात ऑक्सिजन जनरेशन प्लांटची उभारणी करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

