मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्ष सत्ताधारी महाविकास आघाडीला चांगलेच कोंडीत पकडत आहेत. त्यात आता आणखी भर पडलीय. महाविकास आघाडीमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. या संबंधीत आंदोलनात त्या सहभागी झाल्या असून यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
या संदर्भात अतुल भातखळकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलीय. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘ऑक्सिजन, रेमडेसिवीरसाठी जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी रस्त्यावर. सोबतीला मनसे… महा विकास आघाडी सरकारच्या निगरगट्ट राजकारणाचे धिंडवडे आता मंत्र्यांच्या घरातील मंडळीच काढू लागली आहेत कारण ज्याचं जळतं त्यालाच कळतं. फेसबुक वर लाईव्ह येऊन बाता मारल्यामुळे जनतेचे प्रश्न सुटत नाहीत.’
ऑक्सिजन, रेमडेसिव्हीरसाठी जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी रस्त्यावर, सोबतीला मनसे…
महा विकास आघाडी सरकारच्या निगरगट्ट राजकारणाचे धिंडवडे आता मंत्र्यांच्या घरातील मंडळीच काढू लागली आहेत कारण ज्याचं जळतं त्यालाच कळतं.फेसबुक वर लाईव्ह येऊन बाता मारल्यामुळे जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. pic.twitter.com/J242w25CYd— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 20, 2021
आधीच रेमडेसिवीर इंजेक्शन बाबत डॉ. शिंगणे यांच्या वक्तव्यामुळे भाजपच्या वतीने महाविकास आघाडीवर जोरदार टीका करण्यात येत आहे. त्यातल्या त्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाचा सामना सर्वाधिक चर्चेचा विषय बनलाय. त्यात आता जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनसाठी आंदोलन करत असतील तर भाजपच्या हातात आयता विषयच मिळाला, असे म्हणावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या
- योगी सरकारला ‘सर्वोच्च’ दिलासा, हायकोर्टाच्या ‘त्या’ आदेशाला स्थगिती
- कुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांना क्वॉरन्टाइन करा, एमआयएमची मागणी
- ‘महाविकास आघाडी नव्हे, हे तर महाकन्फ्यूज सरकार’, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
- १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस, जाणून घ्या लस घेण्याची प्रक्रिया
- ‘लस घेतलेल्या वारकऱ्यांना चैत्री वारीसाठी परवानगी द्या’, कीर्तनकार महासंघाची मागणी


