Share

‘या’ विषारी वृत्तीला लवकर अटक करा; जितेंद्र आव्हाडांची मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आपल्या व्हायरल व्हिडीओवरून नेहमीच चर्चेत असणारे कालीचरण महाराज(Kalicharan Maharaj) यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यावरुन ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. परंतु यावेळी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर सर्वत्र टीकेची झोड उठवली जात आहे. त्यातच आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील कालीचरण महाराज यांच्यावर टीका केली आहे.

“कालीचरण महाराज हे मूळचे अकोल्याचे आहेत. कधी आरक्षण कधी मुस्लिम विरोध तर कधी स्त्री हक्क विरोधात ते गरळ ओकत असतात आणि ऐकणाऱ्यांच्या मनात विष पसरवण्याचे काम करत असतात. अशा विषारी प्रवृत्तीला ताबडतोव अटक करा आणि ठेचून सुद्धा काढा. ते सनातनी आहेत. निवडणुकीला उभे राहिले 247 मत मिळाली”, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी एकेरी उल्लेख करत कालीचरण महाराज यांच्या अटकेची मागणी केली आहे.

दरम्यान, कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षपार्ह वक्तव्य केले आहे. महात्मा गांधी यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!