Share

पुण्यात बसून नगरची मापं काढणं बंद करा; जयंत पाटलांच चंद्रकांतदादांना प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

पुणे : महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा कहर झाला असल्याने परिस्थिती बिकट झाली होती. दरम्यान, मूळचे कागल(कोल्हापूरचे) असलेले ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मात्र, कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये मुश्रीफांचं नगरकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याची टीका भाजपने केली होती.

‘राज्यातील जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री आहेत की नाही हे उद्धव ठाकरेंनी तपासून पहाव, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तिकडे ३६०० मतदार असलेल्या गोकुळच्या निवडणूकीत बोंबलत बसलेत. एका एका दिवसात ३०-३५ लोक नगरमध्ये मृत्यूमुखी पडत आहेत. मनसेने तिथे पालकमंत्री शोधून द्या ५००० हजार रुपये मिळवा असे आंदोलन देखील केले. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी छडी घेऊन पालकमंत्र्यांना सांगितलं पाहिजे त्या जिल्ह्यातून हलायचं नाही’ असा घणाघात भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता.

आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘चंद्रकांत पाटील बोलतात त्या सर्वच गोष्टी खऱ्या नसतात. हसन मुश्रीफ नगर जिल्ह्यावर व्यवस्थितपणे लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे पुण्यात बसून नगरची मापं काढण्याचा प्रकार सर्वांनीच बंद करावा,’ असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!