Share

गोकुळची निवडणूक होणारच; सर्वोच्च न्यायालयाचा महाडिकांना दणका

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : गेले काही महिने गोकुळ दूध संघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापत आहे. सध्याच्या स्थितीत निवडणूक घेण्यास सत्ताधारी गटाचा विरोध होता. मात्र, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या गटाने मात्र निवडणूक व्हावी अशी मागणी उचलून धरली होती. महाडिक-पी एन पाटील यांच्या सत्ताधारी गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन या निवडणुकीला स्थगिती द्यावी यासाठी याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी घेण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीवर शिक्कामोर्तब केला आहे. न्यायालयाने सत्ताधारी गटाची याचिका फेटाळून लावली आहे. २६ एप्रिल पर्यंत राज्य सरकारला आपले म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाने वेळ दिला होता. राज्य सरकारची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल दिला आहे.

२ मे रोजी निवडणूक पार पडणार असून जिल्ह्यातील आर्थिक केंद्र असलेल्या या दूधसंघावर सत्ता मिळवण्यासाठी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सत्ताधारी महाडिक-पी एन पाटील यांच्या गटाविरोधात राजर्षि शाहू शेतकरी आघाडीद्वारे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, मंत्री राजेंद्र राजेंद्र पाटील यड्रावकर आदी दिग्गज नेत्यांनी एकत्र येऊन दंड थोपटले आहेत. दरम्यान, ४ मे रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!