Share

Jayant Patil | भाजपाला विरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं – जयंत पाटील

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाविकास आघाडीतील निर्णय घेताना आम्हाला विचारले जात नसेल, आमच्याशी चर्चा केली जात नसेल तर आम्हालाही विचार करावा लागेल, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले कि, “नाना पटोले नक्की काय म्हणालेत ते मला माहीत नाही, त्यामुळे मी त्यांना प्रत्युत्तर देणार नाही. पण महाविकास आघाडीत राहण्याची कुणालाही सक्ती नाही. भाजपाला विरोध करण्याची गरज असल्यामुळे आम्ही तीन पक्ष आलो आहोत आणि ज्यांना भाजपाला विरोध करायचा आहे, त्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे.”

पुढे ते असेही म्हणाले कि, “राज्यात शिंदे-फडणवीसांचे जे अवैध सरकार स्थापन झाले आहे, त्याला विरोध करण्यासाठी सर्वजण एकत्र काम करत आहेत. आम्ही तिन्ही पक्षांनी आज एकत्रित बसून विरोधी पक्षाची भूमिका काय असावी यावर चर्चा देखील केली आहे. अंबादास दानवेंबद्दल सांगायचं झालं तर शिवसेना हा अधिकृत पक्ष आहे. कामकाज सल्लागार समितीवर त्यांचा प्रतिनिधी असणे गरजेचे असते. त्यामुळे त्यांनी ते का टाळले हे लक्षात येत नाही.”, असे मत जयंत पाटलांनी व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!