मुंबई: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज प्रसार माध्यमांशी बोलत होते. राजू शेट्टींना आम्ही आमच्यासोबत येण्याचे आव्हान केले आहे, असं यावेळी ते म्हणाले. यावर आता जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रकांतदादा तर सर्वांनाच घ्यायला तयार असतात, परंतु राजू शेट्टींनी त्यांच्या पक्षाची साथ सोडली आहे. नरेंद्र मोदींची शेतकऱ्यांच्या बाबतीतील भूमिका हि चुकीची आहे याची पहिल्यांदा घोषणा राजू शेट्टींनी केली होती. त्यामुळे राजू शेट्टींनी भाजपसोबत जाणं हा विरोधाभास आहे, असे ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

