🕒 1 min read
मुंबई: आयपीएलने आपल्या गौरवशाली १५ वर्षांमध्ये काही नखे चावणारे सामने, काही संस्मरणीय क्षण आणि ऐतिहासिक कामगिरी सादर केली आहे. तसेच आयपीएलच्या १५ वर्षांमध्ये काही विस्मरणीय आणि वादग्रस्त क्षणही पाहायला मिळाले, त्यापैकी एक म्हणजे स्पर्धेच्या २०१३ च्या आवृत्तीत गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातील भांडण. ते आजही क्रिकेट रसिकांच्या लक्षात आहे. आता त्याच वादाबाबत गंभीरने नेमके काय झाले ते सांगितले आहे.
जतीन सप्रू यांच्याशी त्याच्या यूट्यूब शो ‘ओव्हर अँड आउट’ वर बोलताना, गंभीरने (gautam gambhir) स्पष्ट केले की “ते ठीक होते, तो जसा आहे मला त्याच्याकडून तशीच अपेक्षा आहे. मी तसाच आहे. मला ती स्पर्धा आवडते, मला प्रतिस्पर्धी असलेले लोक आवडतात. महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) त्याच्या स्वत:च्या मार्गाने प्रतिस्पर्धी आहे, विराट (virat kohli) एक प्रतिस्पर्धी आहे. त्याच्या स्वत: च्या मार्गाने. काहीवेळा जेव्हा तुम्ही एका बाजूचे नेतृत्व करत असता, तेव्हा तुम्हाला ते करायचे नसले तरी ते करावे लागते कारण तुमचा संघ तुम्हाला हवा तसा खेळायचा असतो. एक नेता म्हणून, काहीवेळा तुम्ही दुसर्या व्यक्तीशी वैयक्तिक संबंधाबाबत विचार करत नाही. तुम्ही संघाचे नेतृत्व करत असल्यामुळे तुम्हाला वेगळे वागावे लागते,”
गौतम गंभीरने विराटची प्रशंसा केली आहे. तो म्हणाला “तेव्हा वैयक्तिक काहीही नव्हते आणि विराट कोहलीविरुद्ध कधीही वैयक्तिक होणार नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतो की त्याने जे काही साध्य केले, मला आश्चर्य वाटले नाही. जेव्हा आम्ही त्याला सुरुवातीला पाहिले तेव्हा तो असाच खेळाडू होता. पण तो कशात बदलला आहे, माझ्या मते तंदुरुस्तीच्या दृष्टिकोनातून आणि त्याने ज्या पद्धतीने त्याच्या कौशल्यांवर काम केले आहे ते जबरदस्त आहे.”
महत्वाच्या बातम्या
- “मविला सरकार घडविताना तुमचा सहभाग पण आता…”, केशव उपाध्येंचे टीकास्त्र
- “AIMIM ने भाजपविरोधी भूमिका दाखवली तर…”; इम्तियाज जलील यांच्या ऑफरवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया!
- विराट सोबतचे वाद विसरत गंभीरने केले कौतुक; म्हणाला “तो १०० शतक…”
- “महाविकास आघाडीचे नेते तपास यंत्रणांच्या रडारवर”- प्रवीण दरेकर
- वकील-डॉक्टर-इंजिनियरपासून शेतकरी, पंजाबच्या मंत्र्यांबद्दल सर्व काही जाणून घ्या…
- “जलील यांची घेतलेली भेट ही सात्वंनपर होती”, राजेश टोपेंची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
