मुंबई: महिला विश्वचषकाच्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताने ७ गड्यांच्या मोबदल्यात २७७ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २७८ धावांचे लक्ष्य ठेवले. शानदार फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने ६ विकेट्सने सामना जिंकला. या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे टीम इंडियाची कमकुवत गोलंदाजी, ज्यामुळे टीम ट्रोल होत आहे.
अनुभवी भारतीय वेगवान झुलन गोस्वामीचा (jhulan goswami) २०० वा सामना होता. ऑकलंडच्या ईडन पार्कवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २७८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून कर्णधार मिताली राज (६८), यस्तिका भाटिया (५९) आणि हरमनप्रीत कौर (नाबाद ५७) यांनी शानदार अर्धशतके झळकावली. ऑस्ट्रेलियाच्या संघाची सुरुवात चांगली झाली. रॅचेल हेन्स आणि अॅलिसा हिली यांनी पहिल्या विकेटमध्ये १२१ धावा केल्या. अॅलिसा हिली आणि कर्णधार मेग लॅनिंगच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने विश्वचषकाच्या सामन्यात भारताचा ६ गडी राखून पराभव केला.
https://twitter.com/HumanTsunaMEE/status/1505101711643340804?s=20&t=NvLjllRapL7o2MeFDwgDIA
I think IndW batters had done well. But Today our bowlers are little eft from their margins.
We will be more on scoreboard if we tried to rotate strike as HK do in lst 5 over.
Try with HK in bowling please.
We want a win against Aussies.
— Debasish (@DebuLeo1988) March 19, 2022
https://twitter.com/VarunNaiyar/status/1415552080656277507?s=20&t=PzB4h3gLB_dGsoJglQThUw
#IndiaWomen ???? #INDW
Quick & shocking impact from bowling!
Bagged 2 wickets so quickly!#JhulanGoswami 's milestone 250th world record ODI wicket in#WomensCricket !
WONDER should happen more now!!
????????????????????????#Target135 for #England !!#INDWvENGW— ThaLaPaThYaN (@tamizhanlogesh) March 16, 2022
भारताच्या पराभवानंतर क्रिकेट रसिक भारतीय महिला संघाच्या कामगिरीवर संतापलेले दिसले. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अतिशय साधेपणाने कामगिरी केली आहे. या स्पर्धेत भारताच्या जिंकलेल्या दोन सामन्यात गोलंदाजांचे मोठे योगदान होते. मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांसमोर टीम इंडियाचे गोलंदाज पूर्णपणे हतबल झालेल्या होत्या. सुरुवातीपासूनच भारताचा एकही गोलंदाज लयीत दिसत नव्हत्या. यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- कपिल शर्मा शो सोडून बनला फूड डिलिव्हरी रायडर, व्हायरल होतोय हा फोटो…
- आयपीएलच्या सामन्यात विराटसोबत मैदानावर झालेल्या भांडणांबाबत, गंभीरचा खुलासा म्हणाला ‘तो जसा…’
- “मविला सरकार घडविताना तुमचा सहभाग पण आता…”, केशव उपाध्येंचे टीकास्त्र
- “AIMIM ने भाजपविरोधी भूमिका दाखवली तर…”; इम्तियाज जलील यांच्या ऑफरवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया!
- विराट सोबतचे वाद विसरत गंभीरने केले कौतुक; म्हणाला “तो १०० शतक…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

