Share

बुमराह “यामुळे” कसोटीचा कर्णधार बनू शकत नाही; माजी भारतीय गोलंदाजी कोचचे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: विराट कोहलीने शेवटी कसोटी कर्णधार पदाचाही राजीनामा दिल्यानंतर आता नवीन कर्णधार कोण असणार याची चर्चा सुरु झाली आहे. एकदिवसीय आणि टी ट्वेन्टीचे कर्णधारपद रोहित शर्मा सांभाळत आहे. तो कसोटी कर्णधार बनणार का याबाबत अजूनही बीसीसीआयने कोणतेही वक्तव्य केले नाही. मात्र सध्या भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कर्णधार व्हावा अशी चर्चा होती. दरम्यान भारतीय संघाचे माजी गोलदांजी कोच भरत अरुण यांनी या संबंधी वक्तव्य केले आहे.

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व का करू शकत नाही, हे भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी स्पष्ट केले आहे. “बुमराहच्या कर्णधारावरही चर्चा झाली. गोष्ट अशी आहे की तो सर्व कसोटी सामने खेळू शकेल का? वर्कलोड मॅनेजमेंट असल्याने बुमराह सर्व कसोटी खेळणार आहे का? मालिकेच्या मध्येच त्याला ब्रेक घ्यावा लागला तर? मग पुन्हा नेतृत्व बदल करावा लागेल. कर्णधारला दुखापत झाल्याशिवाय मालिकेच्या मध्ये कर्णधार बदलणे योग्य नाही असे मला वाटते.”

यावेळी त्यांनी फिरकीपटू अश्विन सुद्धा कर्णधारपदासाठी अयोग्य असल्याचे सांगितले. भविष्यात अशी वेळ असू शकते जिथे अश्विनला खेळण्याची गरज नसेल त्यामुळे कसोटी कर्णधार होण्यासाठी फलंदाजाला प्राधान्य दिले जाईल. गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा १-२ असा पराभव झाल्यानंतर कोहलीने पद राजीनामा दिला. कसोटीचे कर्णधारपद रिक्त राहिले आहे. तेव्हापासून निवड समिती आणि बीसीसीआयने नवीन कर्णधाराची नियुक्ती केलेली नाही. नवीन कर्णधाराचा शोध अजूनही सुरूच आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!