औरंगाबाद : केंद्रात मंत्री पद मिळाल्यानंतर डॉ. भागवत कराड यांनी मराठवाड्याचा दौरा करत ‘जनआर्शिवाद’ यात्रा काढली आहे. बीड मधून सुरू झालेल्या या यात्रेचा समारोप डॉ. कराड राहत असलेल्या औरंगाबाद शहरात होत आहे. शुक्रवारी दुपारी कराड औरंगाबाद शहरात पोहोचणार असल्याने स्थानिक भाजप नेत्यांनी यात्रेची जोरदार तयारी केली आहे. मात्र, डॉ. कराड यांना यात्रेदरम्यान शहरात दाखल होण्यास उशीर झाला. त्यामुळे मिळालेला वेळ सत्कारणी लावत स्थानिक नेत्यांनी ‘जनआर्शिवाद’ यात्रेच्या रथावर चढत सत्काराची हौस भागवली.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना डावलण्यासाठी डॉ. भागवत कराड यांना केंद्रात मंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची ‘जनआर्शिवाद’ यात्रा बीडमधून निघण्यास विरोध होत होता. अखेर पक्षातील वरीष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करत यात्रेची सुरूवात गोपीनाथगडावरुन करण्याचे निश्चित करण्यात आले होते. अखेर पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत या यात्रेला सुरूवात झाली. बीड, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना मार्गे आता ही यात्रा औरंगाबाद जिल्ह्यात दाखल झाली आहे.
मात्र, वेळेचे नियोजन कोलमडल्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांनी ‘जनआर्शिवाद’ यात्रेचा रथ फोटोसेशनसाठी वापरत सत्कार कार्यक्रम उरकला. यामध्ये आमदार अतुल सावे, भाजप प्रवक्ते शिरीष बोराळकर, अनिल मकरीये यांचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, १३ जणांचा मृत्यू
- कोकण पुरामुळे बुडत असताना स्वतःला कोकणचा नेता म्हणवून घेणारे कुठे होते? – भाई जगताप
- ‘गोमूत्र शिंपडणारे समोर आले असते तेच गोमूत्र कोल्ड्रिंग सारखं घशात घालून पुढे निघालो असतो’
- संभाजीराजेंनी केलं प्रकाश आंबेडकरांच कौतुक; तर अशोक चव्हाणांवर हल्लाबोल
- अशोक चव्हाणजी, आम्हीही ९६ टक्केवाले मराठे आहोत!’, संभाजीराजेंचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
