🕒 1 min read
मुंबई – नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री सध्या राज्यातील विविध भागात जन आशीर्वाद यात्रा काढत आहेत. पण, या सर्वांमध्ये चर्चेत आणि केंद्र स्थानी असलेली यात्रा म्हणजे नारायण राणे यांची. नारायण राणे थेट शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात अर्थात कोकणात जोरदार शक्तीप्रदर्शन करताना दिसून येत आहेत यामुळेच राणेंच्या यात्रेची जोरदार चर्चा होत आहे.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला अंगावर घेण्यासाठीच नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आलं आहे, अशी राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा राहिली आहे. यातच आता खुद्द राणे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि महाविकास आघाडीवर विकासाचे मुद्दे मांडत टीका करताना दिसून येत आहेत. ही टीका आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगलीच झोंबत असल्याचे दिसून येत आहे.
स्वतःला कोकणचा नेता म्हणणारी लोक जन आशीर्वाद यात्रेचे नाटक करत आहेत! जेव्हा लोक ऑक्सिजन आणि रक्ताशिवाय मरत होते तेव्हा ते कुठे होते? कोकण पुरामुळे बुडत असताना ते कुठे होते? जेव्हा लोकांना लस मिळत नव्हती तेव्हा ते कुठे होते? pic.twitter.com/Kc205fd1Xj
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) August 20, 2021
या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते भाई जगताप यांनी राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेवर हल्लाबोल केला आहे. स्वतःला कोकणचा नेता म्हणणारी लोक जन आशीर्वाद यात्रेचे नाटक करत आहेत! जेव्हा लोक ऑक्सिजन आणि रक्ताशिवाय मरत होते तेव्हा ते कुठे होते? कोकण पुरामुळे बुडत असताना ते कुठे होते? जेव्हा लोकांना लस मिळत नव्हती तेव्हा ते कुठे होते? अश्या प्रश्नांचा भडीमार जगताप यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बाळासाहेबांचे विचार एखाद्या कंपनीची शेअर्स इक्विटी नाही, त्यांचं दर्शन कुणीही घेऊ शकते’.
- ‘तेव्हा जे शरद पवार तलाक बद्दल म्हणाले होते, तेच तालिबानी शरियाबद्दल सांगतायत’
- ‘आम्ही कोणालाही शिंगावर घ्यायला तयार, मग ते राज ठाकरे असो वा कोणीही’
- धक्कादायक : भारतात कोविशील्डच्या बनावट लसी; जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा
- भाजपला ‘जन आशीर्वाद’ महागात पडला; कल्याण डोंबिवलीत 4 गुन्हे दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
