पुणे : केंद्रीय मंत्रिमंडळात राज्याला नव्याने ४ मंत्रीपदे देण्यात आली असून त्यातील एक कॅबिनेट तर उर्वरित तीन हे केंद्रीय राज्यमंत्रिपदे आहेत. ही मंत्रीपदे देण्यात आल्यानंतर आता राज्यात वेगवेगळ्या भागात भाजपने जन आशिर्वाद यात्रा सुरु केली आहे. कोरोना काळात लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या भाजपने काढलेली ही जनआशीर्वाद यात्रा नसून ‘जनअपमान यात्रा’ अशी टीका याआधी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली होती.
दरम्यान आता या यात्रेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीकास्त्र डागलेले आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या रुग्णांबाबत गृहमंत्रालय देखील चिंतेत आहे. याच पार्श्वभूमीवर गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. हे पत्र समोर आल्यानंतर अजित पवार यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. एकीकडे पत्र पाठवून योग्य ती काळजी घेण्याबाबत आदेश द्यायचे आणि दुसरीकडे जनआशीर्वाद यात्रा काढून लोकांची गर्दी जमवायची याबाबत अजित पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
एकीकडे केंद्र सरकार सांगतेय कोरोना महामारीची काळजी घ्या, गर्दी टाळा तर दुसरीकडे आपल्याच नवीन चार मंत्र्यांना ते सांगतात यात्रा काढा. त्यामुळे कोरोना वाढल्यास त्याला कोण जबाबदार आहे. याचा विचार केंद्र सरकारने करायला हवा. असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सण साजरे करताना काळजी घ्या अन्यथा पुन्हा लॉकडाउन’ ; अजितदादांचा इशारा
- ‘वेतनाअभावी एसटी कर्मचाऱ्याने जीव दिला, अन् अनिल परब नसते उद्योग करतोय’, निलेश राणेंचे टीकास्त्र
- ‘तुम्ही बिनबापाचे आहात काय?..,’ संजय राऊतांनी राणेपुत्रांना शब्दांनी झोडपले
- ‘पंतप्रधानांनी शपथ घेतली की संसद आत्महत्या करते’, पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य
- ‘संजय राऊत बोगस माणूस, त्याचा जिथे दिसेल तिथे ‘करेक्ट’ कार्यक्रम करूत’, निलेश राणेंचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

