जालना : जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या रूग्ण संख्येमध्ये खुप मोठी वाढ होत आहे. या वर प्रतिबंध करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये सध्या लॉकडाऊन होणार नाही. परंतू गुरुवारी या बाबत पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली.
मंगळवारपासून हे बंद
ज्या ठिकाणी तोंडावरचा मास्क काढावा लागतो. अशा प्रकारची सर्व व्यवस्थापने मंगळवारपासून बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यात चहा, भेळपुरी, पाणीपुरी गाडे, छोटी हॉटेल्स, या दुकानांचा समावेश असणार आहे. ज्या हॉटेल मध्ये स्वतंत्र स्वयंपाकाचे गृह आहे, या लॉजिंग अँड बोर्डिंगची व्यवस्था असलेल्या हॉटेलला यामधून वगळले आहे. अशा हॉटेल्समध्ये थांबणारे ग्राहक हे सामान्य माणसांच्या तुलनेमध्ये लोक संपर्कामध्ये कमी येतात. स्वत:च्या खोल्यात जाऊन ते राहतात. स्वयंपाक गृहात येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ देखील कमी असते. त्यामुळे हा निर्णय घेतला. औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या विविध कारखान्यांमध्ये कोरानाची तपासणी बंधनकारक केली आहे.
शुक्रवारपासून लॉक डाऊनची शक्यता ?
आज सर्वांनी लॉक डाऊनला विरोध केला आहे. तरी, शुक्रवारपासून तीन दिवसाचा लॉकडाउन जाहीर करावा अशा सूचनाही काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वेळी केल्या. त्यामुळे शुक्रवार, शनिवार, रविवार, असा तीन दिवसाचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता काही अधिकाऱ्याने वर्तवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आमदारांना लॅपटॉप, गरीब विद्यार्थ्यांना का नाही?, भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- इस्लाम धर्माच्या भावना दुखावल्या, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांच्याविरोधात तक्रार
- मंत्री धनंजय मुंडे यांचा बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांना दिलासा
- शहरांनतर धरणांच्या नामांतराचा मुद्दा समोर, ‘या’ प्रकल्पाचे नाव बदलण्याची मागणी
- मराठा आरक्षणासंदर्भात काय होणार? आज महत्वाची सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
