Share

शहरांनतर धरणांच्या नामांतराचा मुद्दा समोर, ‘या’ प्रकल्पाचे नाव बदलण्याची मागणी

Published On: 

बीड : एकीकडे शहरांचे नामांतर करण्याचाा मुद्दा राज्यभरात गाजत आहे. वास्तुंची नावे देखील बदलण्याचा घाट काही ठिकाणी घातला जात आहे. अशातच बीड जिल्ह्यातून एक नवीन मागणी समोर आली आहे. माजलगाव धरणाचे लोकनेते कै.सुंदररावजी सोळंके जलाशय नामांतर करावे अशी मागणी होत आहे.

माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांच्या दूरदृष्टीतून माजलगाव धरण प्रकल्प उभा राहिला. या प्रकल्प उभारणीतील त्यांच्या योगदानाचे स्मरण पुढील अनेक पिढ्यांना राहावे, यासाठी या धरणाचे नामकरण ‘लोकनेते कै.सुंदररावजी सोळंके जलाशय’ असे करण्यात यावे, अशी मागणी सन्मित्र मित्रमंडळाच्या वतीने आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडे केली आली.

लोकनेते सुंदरराव सोळंके यांच्या भगीरथ प्रयत्नांतून माजलगाव धरण प्रकल्प उभा राहिला. त्यातून हजारो एकर जमीन ओलिताखाली आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमानही उंचावले आहे. तालुका सुजलाम सुफलाम करण्यात माजलगाव धरणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या नामकरणासह धरण परिसराचे सुशोभीकरण करून स्मृती स्मारक आणि उद्यानाची निर्मिती करण्यात यावी. यामुळे शहराच्या वैभवातही भर पडेल व पर्यटनस्थळ म्हणून धरण परिसराचा विकास होईल, अशीही मागणी करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!