Share

भीमा -कोरेगाव हिंसाचार प्रकरणी विश्वास नांगरे पाटील आणि रश्मी शुक्ला यांची चौकशी

Published On: 

🕒 1 min read

भीमाकोरेगाव: भीमाकोरेगाव येथे विजयस्तंभास अभिवादन करण्यास गेलेल्या अनुयायांवर दि. ०१ जानेवारी २०१८ रोजी हल्ला झाला होता. यावेळी भीमाकोरेगाव परिसरात दंगल माजली होती. तसेच त्या पूर्वी एक दिवस शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर २०१७ रोजी ‘एल्गार परिषद’ घेण्यात आली होती. त्यावेळी पुण्याच्या पोलीस आयुक्त प्रशासकीय अधिकारी रश्मी शुक्ला होत्या.

त्यांच्या कार्यकाळात एल्गार परिषदेत सहभागी झालेल्या अनेकांवर कारवाई करत अटक करण्यात आली होती आणि अनेकांना कोठडीत ठेवण्यात आले होते. तसेच भीमाकोरेगाव  हिंसाचाराचे पडसाद संपूर्ण पुण्यात उठले होते. त्यामुळे रश्मी शुक्ला यांची साक्ष महत्वाची ठरणार असल्याने त्यांची चौकशी करण्याची मागणी जे एन पाटील आयोगाने केली होती. त्याप्रकरणी त्यांनी एक अहवाल आयोगाला सादर केला आहे.

भीमाकोरेगाव येथे हिंसाचार झाला, तेव्हा विश्वास नांगरे-पाटील हे कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक होते. त्यामुळे त्यांची साक्ष देखील घेतली जाणार आहे. अशी माहिती आयोगाने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!