Share

‘पंतप्रधान 20-30 किमी अंतरावर असलेल्या शेतकऱ्यांना भेटायला जाऊ शकत नाही हे खेदजनक’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ७० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. २६ जानेवारी झालेल्या गोंधळानंतर आता या आंदोलनाला वेगळं वळण लागल्याचं दिसून येत आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य करत केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली आहे. ‘देशाचे पंतप्रधान 20-30 किमी अंतरावर असलेल्या शेतकऱ्यांना भेटायला जाऊ शकत नाही हे खेदजनक,’ असल्याचं ते म्हणाले आहेत.

‘आज ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांना नागरिकांच्या समस्यांशी काही घेणं देणं नाही. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आज जे शांततेत आंदोलन आहे ते जर वाढलं तर त्याला वेगळं वळण लागेल आणि यासाठी जबाबदार भाजप सरकार असेल. हे सरकार संवेदनशील नाही. शेतकऱ्यांना जी वागणूक मिळत आहे त्यामुळे देशासमोर एक संकट उभं राहणार आहे. लोकशाहीसाठी हे धोकादायक आहे. संसदेत काही झालं नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली नाही. जर चर्चा झाली असती तर आंदोलन इतकं वाढलं नसतं.’ अशी टीका शरद पवार यांनी आज केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!