मुंबई : बोलण्याच्या भरात नारायण राणे बोलले असतील, मुख्यमंत्री पदाबाबत बोलत असताना संयम बाळगणं गरजेचं, पण त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या कारवाईचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. राणेंच्या विधानाच्या पाठीशी भाजप नाही, पण राणेंच्या पाठीशी मात्र पक्ष उभा आहे अशी ग्वाही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
तसेच राज्यातील पोलिसांचा गैरवापर करण्यात येतोय. नाशिक पोलिस आयुक्त स्वत:ला छत्रपती समजतात का? असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे. पोलिसांनी बेकायदेशीर कारवाई करू नये. बेकायदेशीर काम करणारे पोलीस आज कोठे आहेत हे सर्वांना माहितेय असे सूचक विधान फडणवीस यांनी केले आहे. भाजप कार्यालयावर हल्ला केल्यास सहन केला जाणार नाही. राणेंना अटक केली तरी जनआशिर्वाद यात्रा थांबणार नाही. प्रविण दरेकर आणि आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली ती सुरुच राहिल असेही ते म्हणाले.
‘मुख्यमंत्री अमृतमहोत्सव विसरतात ते कोणाच्या मनात संताप निर्माण करू शकतं. पण ते वेगळ्या प्रकारे व्यक्त होऊ शकतं. पण सरकार ज्या पद्धतीनं वागतंय ते म्हणजे गाय मारली म्हणून वासरू मारण्यासारखं आहे’, असे देखील फडणवीस म्हणाले.
‘मला आश्चर्य वाटत कि शर्जील उस्मानी महाराष्ट्रात येतो, भारत मातेला शिव्या देतो, हिंदुना खुनी म्हणतो त्याच्यावर कारवाई करण्याची धमक तुमच्यामध्ये नाही. त्याच्यावर कारवाई करताना शेपट्या टाकता आणि आता नारायण राणेंच्या पकडण्यासाठी संपूर्ण पोलीस दल कामाला लागले आहे.’ अशी टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- युवासेनेच्या कार्यकर्त्यांवर हात उचलणाऱ्या पोलिसांचे निलंबन करा; सरदेसाईंची मागणी
- नारायण राणेंच्या घराबाहेर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा तुफान राडा, पोलिसांचा लाठीचार्ज; पाहा हा व्हिडिओ
- ‘नारायण राणे छक्का है, नारायण राणे भडवा है!’, संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी
- ‘माझी बदनामी केली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करेन’, नारायण राणेंची वृत्तवाहिन्यांना धमकी
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंकडून राष्ट्रदोह घडला, त्यावेळी का शांत होतात?’ राणे पत्रकारांवर घसरले


