मुंबई : एका मुलाखतीत बोलत असतांना केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काँग्रेस पक्ष कमी होत असताना, त्यांची जागा प्रादेशिक पक्ष घेत आहेत आणि काँग्रेसची जागा प्रादेशिक पक्ष घेणं लोकशाहीसाठी चांगलं नाहीये, असे वक्तव्य केले. गडकरींच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसबाबत भाजपची भूमिका बदलत आहे का?, या चर्चांना उधाण आले आहे.
यावेळी विरोधक राहिले तर लोकशाही जिवंत राहील, असं तुम्ही मानता. तर त्या दृष्टीने काय पावलं उचलावी? असा प्रश्न गडकरींना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देत ते म्हणाले की,‘प्रत्येकाला संधी मिळत असते. त्यामुळे निराश होऊन पक्ष आणि विचारधारेला न सोडता काम करत राहिले पाहिजे. एक दिवस पराभव होत असेल, तर एक दिवस विजयही होईल’, असे गडकरी म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘लोकशाही सत्ताधारी पक्ष आणि विरोधक अशा दोन चाकांवर चालते. सक्षम विरोधक ही लोकशाहीची गरज आहे. त्यामुळे मला मनापासून वाटतं की, काँग्रेस पक्ष मजबूत व्हावा.’
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! नवाब मलिकांच्या खात्यांचा कार्यभार ‘या’ मंत्र्यांकडे, ठाकरे सरकारचा निर्णय
- ‘Oscar’ मधल्या विल स्मिथ प्रकारावरून“नीतू कपूर म्हणाल्या, महिला आपल्या भावनांना…”
- IPL 2022: पंजाब विरुद्ध पराभवानंतरही फाफ डु प्लेसिस आनंदित; फलंदाजीचे केले कौतुक
- पहिल्या वीकेंडमध्ये RRR छप्परफाड कमाई
- “…तिथे लोकांचा विरोध नसेल हे पहावं लागेल”, नाणार प्रकल्पाबाबत आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण


